शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 2:33 PM

Nanar refinery project, ratnagiri news इथल्या बेरोजगारीचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल, राजापूर बाजारपेठेला पुन्हा ऊर्जितावस्था आणायची असेल तर आपल्या दाराशी आलेला रिफायनरी प्रकल्प हातचा जाऊ द्यायचा नाही, असा वज्रनिर्धार सर्वपक्षीय नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देनाणार रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांचा एल्गारराजापुरात सर्वपक्षीय बैठक

राजापूर : इथल्या बेरोजगारीचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल, राजापूर बाजारपेठेला पुन्हा ऊर्जितावस्था आणायची असेल तर आपल्या दाराशी आलेला रिफायनरी प्रकल्प हातचा जाऊ द्यायचा नाही, असा वज्रनिर्धार सर्वपक्षीय नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ बैठकीत करण्यात आला.येथील राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली राजापुरात रविवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेकर, सचिव अविनाश महाजन, भाजप तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, ज्येष्ठ व्यापारी मजीद पन्हळेकर, शिवसेनेचे राजा काजवे, भाजपचे वसंत पाटील, व्यापारी संघाचे दीनानाथ कोळवणकर उपस्थित होते.

अविनाश महाजन यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी हा प्रकल्प तालुक्यात होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. अभिजीत गुरव यांनी हा प्रकल्प ज्या भागात होत आहे. त्या सर्व ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन प्रकल्प समर्थनार्थ उभे राहिले पाहिजे, असे सांगितले.

हनिफ काझी यांनी जे सनदशीर मार्गाने मागून मिळत नाही ते संघर्षातून मिळविण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका मांडली. नाणार प्रकल्पासंदर्भात आता सर्वांनी मिळून निर्णायक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे शशिकांत सुतार यांनी सांगितले. सूत्रसंचालन नीलेश पाटणकर यांनी केले.समर्थनार्थ एल्गारप्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती जाणून न घेता प्रकल्पाला होणारा विरोध हा राजकीय आहे. तो तालुक्याच्या भवितव्याला हानिकारक आहे. हे सत्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रकल्प समर्थनार्थ एल्गार करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी