शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गाळउपशामुळे वाशिष्ठी, शिवनदीचे पात्र मोकळे; तीन दिवस मुसळधार पाऊस, तरीही धोका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 18:51 IST

वाशिष्ठी व शिवनदीची वहनक्षमता वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

संदीप बांद्रेचिपळूण : सुमारे साडेसात लाख घनमीटर गाळ उपसा केल्यानंतर वाशिष्ठी व शिवनदीने काहीसा मोकळा श्वास घेतला आहे. त्याचे आता काही चांगले परिणाम दिसू लागले असून, तीन दिवसात ४१५ मिलीमीटर इतका पाऊस होऊनही या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. त्यामुळे वाशिष्ठी व शिवनदीची वहनक्षमता वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.गेली चार महिने वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशाचे काम सुरू होते. सुमारे साडेसात लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्याप्रमाणे वाशिष्ठी नदीत जलसंपदा व यांत्रिकी विभागाने तर शिवनदीत नाम फाऊंडेशनने गाळ उपसा केला. यामध्ये पेठमाप येथील नदीपात्राच्या मधोमध असलेला सुमारे साडेचार एकर क्षेत्राचे बेट काढण्यात आले. वाशिष्ठीच्या दोन्ही पात्रातील गाळ उपसा करण्यात आला. उक्ताड व मिरजोळीतील जुवाड बेटालगतचा गाळही हटविण्यात आला.बहादूरशेखनाका येथील शेकडो घनमीटर गाळ काढण्यात आला. शिवनदीच्या पात्रातही कापसाळ धरणापासून शिवनदीच्या मुखापर्यंत सुमारे तीन लाख घनमीटरहून अधिक गाळ उपसा आला. वाशिष्ठीतील मोठा अडथळा असलेला जुना बाजारपूलही तोडण्यात आला. या सर्वाचा परिपाक म्हणून तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळूनही दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.तीन दिवसातील पावसामुळे वाशिष्ठीतील पाणी पातळी समुद्र सपाटीपासून पाच ते साडेपाच मीटर उंचीपर्यंत वाढली. परंतु धोक्याची पातळी ७ मीटर इतकी असल्याने ही उंची यंदा दोन्ही नद्यांनी गाठलेली नाही. त्यामुळे नद्यांची पाणी वहनक्षमता वाढली असावी, असा निष्कर्ष काढला जात आहे. हा पाऊस तीन दिवसातील असला तरी इतरवेळी त्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती. मात्र यंदा तसा अनुभव अजून आलेला नाही.

वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशामुळे दोन्ही नद्यांची वहनक्षमता निश्चितच वाढली आहे. परंतु गेल्या तीन दिवसात झालेला पाऊस हा सरासरीप्रमाणे नोंदवला गेलेला आहे. अजूनही सलगपणे अतिवृष्टी झालेली नाही. तसेच सध्याचा कालावधी भांगक्षीचा असल्याने अशावेळी समुद्राला भरतीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आताच कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. जेव्हा अमावस्येला मोठे उधाण असते व सलगपणे अतिवृष्टी होते, तेव्हाच पुराची किंवा पुरसदृश्यस्थितीची शक्यता असते. - शहानवाज शाह, जलदूत, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदी