शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

गाळउपशामुळे वाशिष्ठी, शिवनदीचे पात्र मोकळे; तीन दिवस मुसळधार पाऊस, तरीही धोका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 18:51 IST

वाशिष्ठी व शिवनदीची वहनक्षमता वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

संदीप बांद्रेचिपळूण : सुमारे साडेसात लाख घनमीटर गाळ उपसा केल्यानंतर वाशिष्ठी व शिवनदीने काहीसा मोकळा श्वास घेतला आहे. त्याचे आता काही चांगले परिणाम दिसू लागले असून, तीन दिवसात ४१५ मिलीमीटर इतका पाऊस होऊनही या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. त्यामुळे वाशिष्ठी व शिवनदीची वहनक्षमता वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.गेली चार महिने वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशाचे काम सुरू होते. सुमारे साडेसात लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्याप्रमाणे वाशिष्ठी नदीत जलसंपदा व यांत्रिकी विभागाने तर शिवनदीत नाम फाऊंडेशनने गाळ उपसा केला. यामध्ये पेठमाप येथील नदीपात्राच्या मधोमध असलेला सुमारे साडेचार एकर क्षेत्राचे बेट काढण्यात आले. वाशिष्ठीच्या दोन्ही पात्रातील गाळ उपसा करण्यात आला. उक्ताड व मिरजोळीतील जुवाड बेटालगतचा गाळही हटविण्यात आला.बहादूरशेखनाका येथील शेकडो घनमीटर गाळ काढण्यात आला. शिवनदीच्या पात्रातही कापसाळ धरणापासून शिवनदीच्या मुखापर्यंत सुमारे तीन लाख घनमीटरहून अधिक गाळ उपसा आला. वाशिष्ठीतील मोठा अडथळा असलेला जुना बाजारपूलही तोडण्यात आला. या सर्वाचा परिपाक म्हणून तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळूनही दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.तीन दिवसातील पावसामुळे वाशिष्ठीतील पाणी पातळी समुद्र सपाटीपासून पाच ते साडेपाच मीटर उंचीपर्यंत वाढली. परंतु धोक्याची पातळी ७ मीटर इतकी असल्याने ही उंची यंदा दोन्ही नद्यांनी गाठलेली नाही. त्यामुळे नद्यांची पाणी वहनक्षमता वाढली असावी, असा निष्कर्ष काढला जात आहे. हा पाऊस तीन दिवसातील असला तरी इतरवेळी त्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती. मात्र यंदा तसा अनुभव अजून आलेला नाही.

वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशामुळे दोन्ही नद्यांची वहनक्षमता निश्चितच वाढली आहे. परंतु गेल्या तीन दिवसात झालेला पाऊस हा सरासरीप्रमाणे नोंदवला गेलेला आहे. अजूनही सलगपणे अतिवृष्टी झालेली नाही. तसेच सध्याचा कालावधी भांगक्षीचा असल्याने अशावेळी समुद्राला भरतीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आताच कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. जेव्हा अमावस्येला मोठे उधाण असते व सलगपणे अतिवृष्टी होते, तेव्हाच पुराची किंवा पुरसदृश्यस्थितीची शक्यता असते. - शहानवाज शाह, जलदूत, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदी