शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गाळउपशामुळे वाशिष्ठी, शिवनदीचे पात्र मोकळे; तीन दिवस मुसळधार पाऊस, तरीही धोका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 18:51 IST

वाशिष्ठी व शिवनदीची वहनक्षमता वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

संदीप बांद्रेचिपळूण : सुमारे साडेसात लाख घनमीटर गाळ उपसा केल्यानंतर वाशिष्ठी व शिवनदीने काहीसा मोकळा श्वास घेतला आहे. त्याचे आता काही चांगले परिणाम दिसू लागले असून, तीन दिवसात ४१५ मिलीमीटर इतका पाऊस होऊनही या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. त्यामुळे वाशिष्ठी व शिवनदीची वहनक्षमता वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.गेली चार महिने वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशाचे काम सुरू होते. सुमारे साडेसात लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्याप्रमाणे वाशिष्ठी नदीत जलसंपदा व यांत्रिकी विभागाने तर शिवनदीत नाम फाऊंडेशनने गाळ उपसा केला. यामध्ये पेठमाप येथील नदीपात्राच्या मधोमध असलेला सुमारे साडेचार एकर क्षेत्राचे बेट काढण्यात आले. वाशिष्ठीच्या दोन्ही पात्रातील गाळ उपसा करण्यात आला. उक्ताड व मिरजोळीतील जुवाड बेटालगतचा गाळही हटविण्यात आला.बहादूरशेखनाका येथील शेकडो घनमीटर गाळ काढण्यात आला. शिवनदीच्या पात्रातही कापसाळ धरणापासून शिवनदीच्या मुखापर्यंत सुमारे तीन लाख घनमीटरहून अधिक गाळ उपसा आला. वाशिष्ठीतील मोठा अडथळा असलेला जुना बाजारपूलही तोडण्यात आला. या सर्वाचा परिपाक म्हणून तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळूनही दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.तीन दिवसातील पावसामुळे वाशिष्ठीतील पाणी पातळी समुद्र सपाटीपासून पाच ते साडेपाच मीटर उंचीपर्यंत वाढली. परंतु धोक्याची पातळी ७ मीटर इतकी असल्याने ही उंची यंदा दोन्ही नद्यांनी गाठलेली नाही. त्यामुळे नद्यांची पाणी वहनक्षमता वाढली असावी, असा निष्कर्ष काढला जात आहे. हा पाऊस तीन दिवसातील असला तरी इतरवेळी त्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती. मात्र यंदा तसा अनुभव अजून आलेला नाही.

वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशामुळे दोन्ही नद्यांची वहनक्षमता निश्चितच वाढली आहे. परंतु गेल्या तीन दिवसात झालेला पाऊस हा सरासरीप्रमाणे नोंदवला गेलेला आहे. अजूनही सलगपणे अतिवृष्टी झालेली नाही. तसेच सध्याचा कालावधी भांगक्षीचा असल्याने अशावेळी समुद्राला भरतीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आताच कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. जेव्हा अमावस्येला मोठे उधाण असते व सलगपणे अतिवृष्टी होते, तेव्हाच पुराची किंवा पुरसदृश्यस्थितीची शक्यता असते. - शहानवाज शाह, जलदूत, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदी