शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रमजानमुळे आखाती देशात हापूस आंब्याला वाढती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:12 IST

हापूस बाजारात; दर स्थिर राहण्याची अपेक्षा

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला असला, तरी वाशीमध्ये कोकणातील हापूस आंबा विक्रीसाठी दाखल होत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान मास दि. १२ मार्चपासून सुरू होत असल्याने आखाती देशातून आंब्यासाठी मागणी वाढत आहे. त्यामुळे दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. सोमवारी वाशी मार्केटमध्ये १८ हजार ५९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्यात कोकणातून १३ हजार ५३२, तर अन्य राज्यांतील ४,५२७ पेट्यांचा समावेश आहे.अवकाळी पाऊस, नीचतम तापमान, ढगाळ हवामानामुळे आंब्यावर कीडरोड, बुरशीसह तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा आंबा पीक बंपर येण्याच्या आशेवर पाणी फिरले. नैसर्गिक दुष्टचक्रातून वाचलेला आंबा डिसेंबर, जानेवारीपासून विक्रीस येत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाच-दहा हजार पेटी दररोज वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी जात आहे. मात्र, त्यामध्ये निम्म्यापेक्षा अधिक आंबा कर्नाटक, केरळ, तामिळनाडू येथील आहे. उर्वरित ४० ते ४५ टक्के आंबा कोकणातील असून, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आंबा अधिक आहे.

वाशी मार्केटमध्ये आलेल्या आंब्यापैकी ७० ते ७५ टक्के आंबा आखाती प्रदेशात पाठविला जातो. उर्वरित पाच टक्के मुंबईत, तर उर्वरित २० टक्के अन्य देशांत व राज्यात विक्रीसाठी पाठविला जातो. मुस्लिम देशामध्ये रमजानमुळे फळांना वाढती मागणी असते. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच रमजान असल्याने आंब्याला शेवटपर्यंत मागणी चांगली राहणार असल्याने दरही बऱ्यापैकी स्थिर राहणार असल्याचे विक्रेत्यांमधून सांगण्यात येत आहे.

  • आंबा लागवड क्षेत्र - ६६, ४३३ हेक्टर
  • वार्षिक उत्पादन - एक ते सव्वा लाख टन
  • परदेशी विक्री - ६० हजार टन
  • स्थानिक विक्री - २० हजार टन
  • कॅनिग साठी - २० हजार टन
  • वार्षिक उलाढाल ७०० ते ८०० कोटी

दर न परवडणारासध्या वाशी मार्केटमध्ये आंबा पेटीला दोन हजार ते पाच हजार रुपये दर मिळत आहे. खत, कीटकनाशके, वाहतूक खर्च, मजुरी, काढणी, पिंजरा (खोका) या सर्व बाबींचा विचार करता पेटीला मिळणारा दर परवडत नसल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होतो. खत व्यवस्थापनापासून आंबा काढणी ते विक्रीसाठी पाठवेपर्यंत प्रचंड खर्च येतो. त्यामुळे आंब्याचे दर टिकून राहणे गरजेचे आहे. दर टिकले तर शेतकऱ्यांनी केलेला खर्च काहीअंशी भरून काढण्यासाठी मदत होणार आहे. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाRamadanरमजान