शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे चित्र अस्पष्टच, आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 15:56 IST

कीड रोगापासून संरक्षणासाठी बागायतदारांची धडपड

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे मोहर प्रक्रिया अद्याप मंदावलेली आहे. पालवीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे अद्यापतरी आंबा पिकाचे चित्र अस्पष्ट आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. थंडीचे प्रमाण वाढले तर मोहरप्रक्रिया वाढू शकते. जानेवारी, फेब्रुवारीमध्येही मोहर येत असल्याने शेतकऱ्यांना अद्याप आंबा पिकासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.नोव्हेंबरमध्ये मोहर येण्यास सुरुवात झाली. मात्र, मोहरचे प्रमाण अवघे दहा टक्के असून, ८० टक्के झाडांना पालवी आहे. पालवीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने पालवी जून होण्यासाठी एक ते दीड महिना बागायतदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. थंडी पडू लागल्याने पालवी नसलेल्या झाडांना मोहर सुरू झाला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी गायब आहे. अधूनमधून ढगाळ हवामान असल्याने कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बागायतदारांना बुरशीनाशक, तुडतुडा नियंत्रित, कीडनाशक फवारणी करावी लागत आहे.तुडतुडा नियंत्रणात न आणल्यास पालवीवर तुडतुड्याची विष्टा साचून काळे डाग राहतात. पानांवर काळे डाग चिकटून राहिल्याने मोहर तयार होण्याच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होते, शिवाय उत्पादनावरही परिणाम होतो. चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पालवीवरील तुडतुडा, थ्रिप्स नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.चार, पाच, सहा डझनाची आंबापेटी भरली जाते. मात्र, या पेटीसाठी किमान १५०० ते १७०० रुपये वर्षाला खर्च येतो. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत हा खर्च विभागाला जातो. त्यामुळे पेटीला किमान २ हजार रुपये दर मिळाला तर शेतकऱ्यांना दीडशे ते दोनशे रुपये सुटतात.पेटीचा विभागलेला खर्चकीटकनाशक : पाचशे ते सातशे रुपयेमजुरी : शंभर ते दोनशे रुपयेराखणी : शंभर ते दीडशे रुपयेखते, साफसफाई : तीनशे ते चारशे रुपये

हवामानातील बदल, बनावट कीटकनाशकाची विक्री, कीटकनाशकाच्या दरात होणारी वाढ, वाढते इंधन दर, एकूण महागाईचा परिणाम आंबा उत्पादनाला बसत आहे. खत व्यवस्थापन ते आंबा बाजारात येईपर्यंतचा खर्च अधिक आहे. तुलनेने पेटीला दर लाभत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हवामानातील बदलामुळे अद्याप आंब्याचे चित्र अस्पष्ट असले तरी मकरसंक्रांतीनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भेसळयुक्त कीटकनाशक विक्रीवर प्रतिबंध आणणे आवश्यक आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा