शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे चित्र अस्पष्टच, आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 15:56 IST

कीड रोगापासून संरक्षणासाठी बागायतदारांची धडपड

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे मोहर प्रक्रिया अद्याप मंदावलेली आहे. पालवीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे अद्यापतरी आंबा पिकाचे चित्र अस्पष्ट आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. थंडीचे प्रमाण वाढले तर मोहरप्रक्रिया वाढू शकते. जानेवारी, फेब्रुवारीमध्येही मोहर येत असल्याने शेतकऱ्यांना अद्याप आंबा पिकासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.नोव्हेंबरमध्ये मोहर येण्यास सुरुवात झाली. मात्र, मोहरचे प्रमाण अवघे दहा टक्के असून, ८० टक्के झाडांना पालवी आहे. पालवीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने पालवी जून होण्यासाठी एक ते दीड महिना बागायतदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. थंडी पडू लागल्याने पालवी नसलेल्या झाडांना मोहर सुरू झाला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी गायब आहे. अधूनमधून ढगाळ हवामान असल्याने कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बागायतदारांना बुरशीनाशक, तुडतुडा नियंत्रित, कीडनाशक फवारणी करावी लागत आहे.तुडतुडा नियंत्रणात न आणल्यास पालवीवर तुडतुड्याची विष्टा साचून काळे डाग राहतात. पानांवर काळे डाग चिकटून राहिल्याने मोहर तयार होण्याच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होते, शिवाय उत्पादनावरही परिणाम होतो. चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पालवीवरील तुडतुडा, थ्रिप्स नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.चार, पाच, सहा डझनाची आंबापेटी भरली जाते. मात्र, या पेटीसाठी किमान १५०० ते १७०० रुपये वर्षाला खर्च येतो. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत हा खर्च विभागाला जातो. त्यामुळे पेटीला किमान २ हजार रुपये दर मिळाला तर शेतकऱ्यांना दीडशे ते दोनशे रुपये सुटतात.पेटीचा विभागलेला खर्चकीटकनाशक : पाचशे ते सातशे रुपयेमजुरी : शंभर ते दोनशे रुपयेराखणी : शंभर ते दीडशे रुपयेखते, साफसफाई : तीनशे ते चारशे रुपये

हवामानातील बदल, बनावट कीटकनाशकाची विक्री, कीटकनाशकाच्या दरात होणारी वाढ, वाढते इंधन दर, एकूण महागाईचा परिणाम आंबा उत्पादनाला बसत आहे. खत व्यवस्थापन ते आंबा बाजारात येईपर्यंतचा खर्च अधिक आहे. तुलनेने पेटीला दर लाभत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हवामानातील बदलामुळे अद्याप आंब्याचे चित्र अस्पष्ट असले तरी मकरसंक्रांतीनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भेसळयुक्त कीटकनाशक विक्रीवर प्रतिबंध आणणे आवश्यक आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा