शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे चित्र अस्पष्टच, आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 15:56 IST

कीड रोगापासून संरक्षणासाठी बागायतदारांची धडपड

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे मोहर प्रक्रिया अद्याप मंदावलेली आहे. पालवीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे अद्यापतरी आंबा पिकाचे चित्र अस्पष्ट आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. थंडीचे प्रमाण वाढले तर मोहरप्रक्रिया वाढू शकते. जानेवारी, फेब्रुवारीमध्येही मोहर येत असल्याने शेतकऱ्यांना अद्याप आंबा पिकासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.नोव्हेंबरमध्ये मोहर येण्यास सुरुवात झाली. मात्र, मोहरचे प्रमाण अवघे दहा टक्के असून, ८० टक्के झाडांना पालवी आहे. पालवीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने पालवी जून होण्यासाठी एक ते दीड महिना बागायतदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. थंडी पडू लागल्याने पालवी नसलेल्या झाडांना मोहर सुरू झाला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी गायब आहे. अधूनमधून ढगाळ हवामान असल्याने कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बागायतदारांना बुरशीनाशक, तुडतुडा नियंत्रित, कीडनाशक फवारणी करावी लागत आहे.तुडतुडा नियंत्रणात न आणल्यास पालवीवर तुडतुड्याची विष्टा साचून काळे डाग राहतात. पानांवर काळे डाग चिकटून राहिल्याने मोहर तयार होण्याच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होते, शिवाय उत्पादनावरही परिणाम होतो. चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पालवीवरील तुडतुडा, थ्रिप्स नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.चार, पाच, सहा डझनाची आंबापेटी भरली जाते. मात्र, या पेटीसाठी किमान १५०० ते १७०० रुपये वर्षाला खर्च येतो. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत हा खर्च विभागाला जातो. त्यामुळे पेटीला किमान २ हजार रुपये दर मिळाला तर शेतकऱ्यांना दीडशे ते दोनशे रुपये सुटतात.पेटीचा विभागलेला खर्चकीटकनाशक : पाचशे ते सातशे रुपयेमजुरी : शंभर ते दोनशे रुपयेराखणी : शंभर ते दीडशे रुपयेखते, साफसफाई : तीनशे ते चारशे रुपये

हवामानातील बदल, बनावट कीटकनाशकाची विक्री, कीटकनाशकाच्या दरात होणारी वाढ, वाढते इंधन दर, एकूण महागाईचा परिणाम आंबा उत्पादनाला बसत आहे. खत व्यवस्थापन ते आंबा बाजारात येईपर्यंतचा खर्च अधिक आहे. तुलनेने पेटीला दर लाभत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हवामानातील बदलामुळे अद्याप आंब्याचे चित्र अस्पष्ट असले तरी मकरसंक्रांतीनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भेसळयुक्त कीटकनाशक विक्रीवर प्रतिबंध आणणे आवश्यक आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा