शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिक धोक्यात, ढगाळ वातावरणामुळे मोहोराला बुरशीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:18 IST

ओखी चक्रीवादळ सध्या सुरतच्या दिशेने जात असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. वास्तविक रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले असून, ढगाळ वातावरण, तसेच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत, प्रतिबंधात्मक फवारणीसाठी केलेला खर्च वायापाणी साचल्यामुळे मोहोर कुजण्याचा धोका सध्या ६० टक्के पालवी ४० टक्के मोहोर अशी स्थितीबुरशीजन्य रोग व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका

रत्नागिरी : ओखी चक्रीवादळ सध्या सुरतच्या दिशेने जात असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. वास्तविक रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले असून, ढगाळ वातावरण, तसेच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसामुळे आंबा पिक धोक्यात आहे.

पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पाऊस झाला आहे. पाऊस थांबला तरी ढगाळ हवामान असल्यामुळे कलमांच्या मोहोरावर बुरशीजन्य रोग, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपासून थंडी गायब असल्याने उष्मा जाणवत होता. रत्नागिरी वगळता जिल्ह्यात सोमवारी अन्य ठिकाणी पाऊस पडला. मात्र, सोमवारी रात्रीपासून रत्नागिरीतही पाऊस सुरू झाला आहे. सरीवर पाऊस कोसळत असला तरी ओलावा वाळण्यापूर्वीच पाऊस पडत आहे. त्यामुळे मोहोर चांगलाच भिजला आहे.

काही ठिकाणी भिजल्यामुळे मोहोर वाकला आहे. पावसाचे पाणी मोहोरात साचल्यामुळे मोहोर कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी फळधारणा झाली आहे. कणी, वाटण्याएवढी फळधारणा झाली असून, पावसामुळे आंबा पिक धोक्यात आहे.

सध्या ६० टक्के पालवी ४० टक्के मोहोर अशी स्थिती आहे. सध्या तुडतुड्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, दोन दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे व पावसामुळे बुरशीजन्य रोग व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.हवामानात दरवर्षी होणाऱ्या बदलामुळे आंबापिकावर परिणाम होत आहे. गतवर्षी आंबा एकाच वेळी बाजारात आला. शिवाय त्याच दरम्यान कर्नाटकचा हापूस बाजारात आल्याने दर कोसळले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.

यावर्षी सुरूवातीपासूनच पालवीचे प्रमाण अधिक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झाल्यामुळे थंडी उशिरा सुरू झाली. डिसेंबर सुरू झाला तरी मोहोर प्रक्रिया किरकोळ आहे. याशिवाय हवामानातील बदलामुळे, थंडी गायब असल्याने मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे.

फयान वादळानंतर सलग चार - पाच दिवस पाऊस झाला होता. त्यामुळे ओखी वादळ पुढे सरकले असले तरी पाऊस अजून किती दिवस लागेल, याबाबत आताच सांगणे शक्य होणार नाही. मात्र, पावसामुळे आंबापीक धोक्यात आले आहे.

अजून पाऊस सुरूच राहिला तर शेतकरीवर्गाला फार मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पाऊस थांबला तरी शेतकऱ्यांना कीड, रोग, बुरशी नष्ट करण्यासाठी उच्चत्तम प्रतीची बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी लागणार आहे.

 

दरवर्षी हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी थंडी उशिरा सुरू झाली. पालवीचे प्रमाणच सर्वाधिक आहे. परंतु किरकोळ मोहोर प्रक्रिया सुरू झाली. ओखी वादळामुळे वादळी वारे झाले नाहीत, तर पाऊस मात्र बऱ्यापैकी झाला आहे. पावसाचे पाणी मोहोरात गेल्यामुळे मोहोर कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. झालेली फळधारणाही धोक्यात आली आहे. ढगाळ हवामानामुळे बुरशी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कीड, बुरशीपासून संरक्षणासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. शिवाय आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोहोर संरक्षणासाठी केलेल्या फवारणीचा खर्च मात्र वाया गेला आहे.- टी. एस. घवाळी, शेतकरी, रत्नागिरी.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळRatnagiriरत्नागिरीfruitsफळे