शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवरील बोटीचे नुकसान, किनारपट्टीवरील घरे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 14:02 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे - पाजपंढरी - आडे -उटंबर  बुरोंडी किनारपट्टीवर रात्री  समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे  पाणी घरात घुसले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचे नुकसान झालं आहे.

ठळक मुद्देसमुद्र अजूनही खवळलेलाच, घरात घुसले पाणी धुपप्रतिबंधक बंधारा ओलांडून समुद्राचे पाणी रस्त्यावर रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसास सुरवात

शिवाजी गोरे 

दापोली : केंद्रबिंदू गुजरातच्या दिशेने असला तरीही ओखी वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे - पाजपंढरी - आडे -उटंबर  बुरोंडी किनारपट्टीवर रात्री  समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे  पाणी घरात घुसले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचे नुकसान झालं आहे.

राजिवडा - मांडवी किनारपट्टीवर काही ठिकाणी घरात समुद्राचे पाणी घुसले तर काही ठिकाणी धुपप्रतिबंधक बंधारा ओलांडून समुद्राचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड आणि मांडवी किनाऱ्यावर ओखी वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. वादळामुळे समुद्राला उधाण आले असून किनारपट्टीवरील काही भागात समुद्राचे पाणी शिरले आहे. पूर्णगड येथील मजदूर मोहल्ला, शितोचेवाडी, श्रीकृष्णनगर येथे लोकवस्तीत मध्यरात्री पाणी घुसले.

रात्री साडेबाराच्या सुमारास जोराच्या लाट्या उसळल्याने घरात पाणी घुसले. उधाणमुळे किनारपट्टीवरील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मांडवी येथेही लाटांचे तांडव पाहायला मिळाले. मांडवी, राजिवडा येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरून पाणी रस्त्यावर आले. येथेही काही घरे पाण्याखाली गेली आहेत. 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसास सुरवात

दरम्यान वादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. किनारपट्टीवर जोराचे वारे वाहात असून पावसास सुरुवात झाली आहे. दापोली तालुक्‍यात पहाटेपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. वातावरणातील बदलामुळे आज कोकणातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

आज सकाळपासूनच जोरदार वारा सुरू आहे. समुद्र अजूनही खवळलेलाच आहे. नेहमी पेक्षा लाटांची उंची सुद्धा अधिक आहे. पावसाचे वातावरण असल्यामुळे लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे . 

मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या संदेशानुसार महाराष्ट्र व गोवा राज्याच्या समुद्रात ताशी ५०ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहू लागले आहेत. समुद्र खवळलेला आहे. मच्छीमारांनी येत्या ४८ तासांत समुद्रात जावू नये, असा इशारा देण्यात आला आहे. जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किना-यावर परत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळRatnagiriरत्नागिरी