शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवरील बोटीचे नुकसान, किनारपट्टीवरील घरे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 14:02 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे - पाजपंढरी - आडे -उटंबर  बुरोंडी किनारपट्टीवर रात्री  समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे  पाणी घरात घुसले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचे नुकसान झालं आहे.

ठळक मुद्देसमुद्र अजूनही खवळलेलाच, घरात घुसले पाणी धुपप्रतिबंधक बंधारा ओलांडून समुद्राचे पाणी रस्त्यावर रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसास सुरवात

शिवाजी गोरे 

दापोली : केंद्रबिंदू गुजरातच्या दिशेने असला तरीही ओखी वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे - पाजपंढरी - आडे -उटंबर  बुरोंडी किनारपट्टीवर रात्री  समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे  पाणी घरात घुसले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचे नुकसान झालं आहे.

राजिवडा - मांडवी किनारपट्टीवर काही ठिकाणी घरात समुद्राचे पाणी घुसले तर काही ठिकाणी धुपप्रतिबंधक बंधारा ओलांडून समुद्राचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड आणि मांडवी किनाऱ्यावर ओखी वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. वादळामुळे समुद्राला उधाण आले असून किनारपट्टीवरील काही भागात समुद्राचे पाणी शिरले आहे. पूर्णगड येथील मजदूर मोहल्ला, शितोचेवाडी, श्रीकृष्णनगर येथे लोकवस्तीत मध्यरात्री पाणी घुसले.

रात्री साडेबाराच्या सुमारास जोराच्या लाट्या उसळल्याने घरात पाणी घुसले. उधाणमुळे किनारपट्टीवरील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मांडवी येथेही लाटांचे तांडव पाहायला मिळाले. मांडवी, राजिवडा येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरून पाणी रस्त्यावर आले. येथेही काही घरे पाण्याखाली गेली आहेत. 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसास सुरवात

दरम्यान वादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. किनारपट्टीवर जोराचे वारे वाहात असून पावसास सुरुवात झाली आहे. दापोली तालुक्‍यात पहाटेपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. वातावरणातील बदलामुळे आज कोकणातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

आज सकाळपासूनच जोरदार वारा सुरू आहे. समुद्र अजूनही खवळलेलाच आहे. नेहमी पेक्षा लाटांची उंची सुद्धा अधिक आहे. पावसाचे वातावरण असल्यामुळे लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे . 

मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या संदेशानुसार महाराष्ट्र व गोवा राज्याच्या समुद्रात ताशी ५०ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहू लागले आहेत. समुद्र खवळलेला आहे. मच्छीमारांनी येत्या ४८ तासांत समुद्रात जावू नये, असा इशारा देण्यात आला आहे. जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किना-यावर परत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळRatnagiriरत्नागिरी