शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी न भरल्याने देवधे वरची सावंतवाडीतील ग्रामस्थांचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 16:42 IST

लांजा तालुक्यातील देवधे वरची सावंतवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने गणपती उत्सवापासून ग्रामस्थांचे पाणी बंद केले आहे.

ठळक मुद्देदेवधे ग्रामपंचायतीची कारवाईमीटरच बंद केल्याने ग्रामस्थांना जलस्वराज्याच्या पाण्यापासून मुकावे लागले वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने केली कारवाई

लांजा , दि. १९ :  तालुक्यातील देवधे वरची सावंतवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने गणपती उत्सवापासून ग्रामस्थांचे पाणी बंद केले आहे.

ग्रामपंचायतीच्यावतीने वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने जलस्वराज्य योजनेचा वाडीमध्ये असणारा मीटरच बंद केल्याने ग्रामस्थांना जलस्वराज्याच्या पाण्यापासून मुकावे लागले आहे. या बाबत ग्रामपंचायतीकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देवधे ग्रामपंचायतीच्यावतीने गावात जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीयोजना सुरू आहे. मात्र गावातील वरची सावंतवाडी येथे दोन ते अडीच महीने झाले तरी पाण्यापासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागले आहे. ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीने पाणी बंद केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.

देवधे वरची सावंतवाडी येथील काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची पाणीपट्टी न भरल्याने ग्रामपंचायतीने येथील पाणी पुरवठा बंद केला आहे. मात्र यावर कोणताही तोडगा न काढता एकाएकी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायती विरोधात चिड निर्माण झाली आहे.

त्यामुळे ग्रामपंचायतीने या वाडीचे महावितरण कंपनीचे पाण्याचे वीजबिलही भरलेले नाही. ते न भरल्याने महावितरणने वरची सावंतवाडी येथील पाण्याचा मिटरच बंद केला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांसमोर पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे.

पाण्यासाठी सार्वजनिक वाडीमध्ये एकच विहीर असून तीही दूरवर असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नाकडे ग्रामपंचायतीनेही दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील काही ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरली तर काहींनी भरली नसल्याने महावितरणने मिटर बंद केला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या पाण्याच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :konkanकोकणWaterपाणी