शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी न भरल्याने देवधे वरची सावंतवाडीतील ग्रामस्थांचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 16:42 IST

लांजा तालुक्यातील देवधे वरची सावंतवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने गणपती उत्सवापासून ग्रामस्थांचे पाणी बंद केले आहे.

ठळक मुद्देदेवधे ग्रामपंचायतीची कारवाईमीटरच बंद केल्याने ग्रामस्थांना जलस्वराज्याच्या पाण्यापासून मुकावे लागले वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने केली कारवाई

लांजा , दि. १९ :  तालुक्यातील देवधे वरची सावंतवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने गणपती उत्सवापासून ग्रामस्थांचे पाणी बंद केले आहे.

ग्रामपंचायतीच्यावतीने वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने जलस्वराज्य योजनेचा वाडीमध्ये असणारा मीटरच बंद केल्याने ग्रामस्थांना जलस्वराज्याच्या पाण्यापासून मुकावे लागले आहे. या बाबत ग्रामपंचायतीकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देवधे ग्रामपंचायतीच्यावतीने गावात जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीयोजना सुरू आहे. मात्र गावातील वरची सावंतवाडी येथे दोन ते अडीच महीने झाले तरी पाण्यापासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागले आहे. ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीने पाणी बंद केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.

देवधे वरची सावंतवाडी येथील काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची पाणीपट्टी न भरल्याने ग्रामपंचायतीने येथील पाणी पुरवठा बंद केला आहे. मात्र यावर कोणताही तोडगा न काढता एकाएकी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायती विरोधात चिड निर्माण झाली आहे.

त्यामुळे ग्रामपंचायतीने या वाडीचे महावितरण कंपनीचे पाण्याचे वीजबिलही भरलेले नाही. ते न भरल्याने महावितरणने वरची सावंतवाडी येथील पाण्याचा मिटरच बंद केला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांसमोर पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे.

पाण्यासाठी सार्वजनिक वाडीमध्ये एकच विहीर असून तीही दूरवर असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नाकडे ग्रामपंचायतीनेही दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील काही ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरली तर काहींनी भरली नसल्याने महावितरणने मिटर बंद केला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या पाण्याच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :konkanकोकणWaterपाणी