शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

दसरा-दिवाळीमुळे बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 13:09 IST

Navratri, Diwali, Ratnagirinews रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागला असल्याने ग्राहकांमधील भीतीही बऱ्यापैकी कमी झाली आहे. दसरा, दीपावलीचा सण तोंडावर असून, तुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. परिणामी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे.

ठळक मुद्देदसरा-दिवाळीमुळे बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ लग्नसराईमुळे खरेदीसाठी प्रारंभ

मेहरून नाकाडेरत्नागिरी : जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागला असल्याने ग्राहकांमधील भीतीही बऱ्यापैकी कमी झाली आहे. दसरा, दीपावलीचा सण तोंडावर असून, तुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. परिणामी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बाजारपेठेला चांगलाच फटका बसला होता. एप्रिल, मे महिन्यात लग्नसराईमुळे वर्षभराच्या ६० टक्के व्यवसाय होतो. मात्र, लॉकडाऊनमुळे कोट्यवधीचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. गणेशोत्सवातही बाजारपेठ शांत होती. त्यामुळे यावर्षी मान्सून सेलऎवजी व्यापाऱ्यांनी आता सेल लावले असून, २५ ते ३० टक्के विक्रीत सवलत देण्यात येत आहे.तुलसी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होणार असल्याने ग्राहकांनी खरेदी सुरू केली आहे. लॉकडाऊनपासून ठप्प असलेले बाजारापेठेतील व्यवहार आता पूर्वपदावर येऊ लागले आहेत.

कोरोना कालावधीत सहा महिन्यात प्रचंड मंदीचा सोसावी लागली. परंतु दसरा-दिवाळीमुळे ग्राहकांनी आता खरेदी सुरू केली आहे. तयार कपड्यांना विशेष मागणी असून, ग्राहकांसाठी खरेदीमध्ये सवलत दिली आहे. दीपावलीनंतर लग्नसराई असल्याने खरेदीसाठी गर्दी वाढेल, अशी अपेक्षा आहे.- अविनाश विश्वकर्मा, विक्रेता

ग्राहकांमधील कोरोनाची भीती कमी झाली असल्यानेच खरेदीसाठी लोक घराबाहेर पडू लागले आहेत. कोरोनामुळे लग्नसोहळे रद्द करण्यात आले होते. मात्र, दीपावलीनंतर लग्नसमारंभ असल्याने खरेदीसाठी ग्राहक घाई करू लागले आहेत. यावर्षी ग्राहकांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. परंतु दसरा-दिवाळीची खरेदी मात्र सुरू केली आहे.- संजय जैन, विक्रेता

टॅग्स :DasaraदसराNavratriनवरात्रीRatnagiriरत्नागिरीDiwaliदिवाळी