शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
4
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
5
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

रस्त्यातील खोदाईमुळे पावसाळ्यात रत्नागिरीकरांचे होणार पुरते हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:24 IST

road transport Ratnagiri- रत्नागिरी शहरातील सुधारित नळपाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होऊन खराब रस्त्यातून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका होण्याची आशा होती. नगराध्यक्षांनीही दोन महिन्यात रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या कामासाठी डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याने रत्नागिरीकरांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देरस्त्यातील खोदाईमुळे पावसाळ्यात रत्नागिरीकरांचे होणार पुरते हालगुळगुळीत रस्त्यांऐवजी चिखलाच्या रस्त्यातूनच करावा लागणार प्रवास

रत्नागिरी : शहरातील सुधारित नळपाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होऊन खराब रस्त्यातून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका होण्याची आशा होती. नगराध्यक्षांनीही दोन महिन्यात रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या कामासाठी डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याने रत्नागिरीकरांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन खराब झाल्याने नवीन सुधारित नळपाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या बाजूला खोदाईचे काम करण्यात आले. या खोदाईमुळे अनेक ठिकाणी अर्धा रस्ताच गायब झाला आहे.

या नळपाणी योजनेबरोबरच शहरात गॅस लाईन आणि केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ही कामे पूर्णत्वाला गेली असून, अजूनही नळपाणी योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. शीळपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यामुळे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दोन महिन्यांतच शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत करून नागरिकांचा त्रास कमी करण्याचे आश्वासन दिले होते.नगराध्यक्षांच्या या आश्वासनामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते गुळगुळीत होऊन प्रवास सुखकर होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, नळपाणी योजनेच्या कामासाठी ठेकेदाराने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. नगर परिषदेने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पावसाळ्याच्या कालावधीत काम करणे मुश्कील होणार आहे. त्यातच पावसाळ्यात रस्ता डांबरीकरणाची कामे न करण्याचे निर्देश शासनाकडून दिलेले आहेत. हे काम पूर्ण झाल्याशिवाय मारलेला चर बुजविता येणार नाही.

अनेक ठिकाणी अजूनही चरामधील माती तशीच ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी माती टाकल्याने उंचवटे तयार झाले आहेत. पावसाळ्यातही हे चर, तसेच राहणार असल्याने रस्ता चिखलमय होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना चिखलमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. चरांमध्ये पाणी साचून अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे.अपघातांचा धोकाअर्धवट राहिलेल्या चरांमधील माती पावसाळ्यात आणखी खाली जाऊन त्याठिकाणी खड्डा पडण्याची भीती अधिक आहे. या खड्डयात पाणी साचल्याच नागरिकांच्या तो लक्षात येणार नाही. त्यामुळे त्यात वाहन फसण्याचा किंवा पादचारी अडकून पडण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढणार आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRatnagiriरत्नागिरी