शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

रस्त्यातील खोदाईमुळे पावसाळ्यात रत्नागिरीकरांचे होणार पुरते हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:24 IST

road transport Ratnagiri- रत्नागिरी शहरातील सुधारित नळपाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होऊन खराब रस्त्यातून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका होण्याची आशा होती. नगराध्यक्षांनीही दोन महिन्यात रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या कामासाठी डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याने रत्नागिरीकरांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देरस्त्यातील खोदाईमुळे पावसाळ्यात रत्नागिरीकरांचे होणार पुरते हालगुळगुळीत रस्त्यांऐवजी चिखलाच्या रस्त्यातूनच करावा लागणार प्रवास

रत्नागिरी : शहरातील सुधारित नळपाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होऊन खराब रस्त्यातून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका होण्याची आशा होती. नगराध्यक्षांनीही दोन महिन्यात रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या कामासाठी डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याने रत्नागिरीकरांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन खराब झाल्याने नवीन सुधारित नळपाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या बाजूला खोदाईचे काम करण्यात आले. या खोदाईमुळे अनेक ठिकाणी अर्धा रस्ताच गायब झाला आहे.

या नळपाणी योजनेबरोबरच शहरात गॅस लाईन आणि केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ही कामे पूर्णत्वाला गेली असून, अजूनही नळपाणी योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. शीळपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यामुळे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दोन महिन्यांतच शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत करून नागरिकांचा त्रास कमी करण्याचे आश्वासन दिले होते.नगराध्यक्षांच्या या आश्वासनामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते गुळगुळीत होऊन प्रवास सुखकर होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, नळपाणी योजनेच्या कामासाठी ठेकेदाराने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. नगर परिषदेने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पावसाळ्याच्या कालावधीत काम करणे मुश्कील होणार आहे. त्यातच पावसाळ्यात रस्ता डांबरीकरणाची कामे न करण्याचे निर्देश शासनाकडून दिलेले आहेत. हे काम पूर्ण झाल्याशिवाय मारलेला चर बुजविता येणार नाही.

अनेक ठिकाणी अजूनही चरामधील माती तशीच ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी माती टाकल्याने उंचवटे तयार झाले आहेत. पावसाळ्यातही हे चर, तसेच राहणार असल्याने रस्ता चिखलमय होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना चिखलमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. चरांमध्ये पाणी साचून अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे.अपघातांचा धोकाअर्धवट राहिलेल्या चरांमधील माती पावसाळ्यात आणखी खाली जाऊन त्याठिकाणी खड्डा पडण्याची भीती अधिक आहे. या खड्डयात पाणी साचल्याच नागरिकांच्या तो लक्षात येणार नाही. त्यामुळे त्यात वाहन फसण्याचा किंवा पादचारी अडकून पडण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढणार आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRatnagiriरत्नागिरी