शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गेली तीन वर्षे लाटांचा मारा खात बसरा स्टार जहाज एकाच जागी, मिऱ्या समुद्र किनारी पडलंय अडकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:25 IST

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

रत्नागिरी : येथील मिऱ्या समुद्र किनारी अडकून पडलेले बसरा स्टार जहाज बाहेर काढण्यासाठी दुबईतील एजन्सीने अनुत्सुकता दाखविली आहे. त्यामुळे हे जहाज अजूनही लाटांचा मारा सहन करत किनाऱ्यावर उभे आहे.हे इंधनवाहक जहाज दक्षिण आफ्रिकेहून ते शारजा दुबईला निघाले होते. निसर्ग चक्रीवादळामुळे हे जहाज भरकटून मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर ३ जून २०१९ ला आले हाेते. तांत्रिक बिघाडामुळे ते जहाज भगवती बंदरापासून काही अंतरावर नांगरून ठेवले होते; मात्र अजस्त्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्र किनारी लागले. या जहाजामध्ये १३ क्रूजर होते. मेरिटाईम बोर्ड, पोलीस, तटरक्षक दल आदींच्या मदतीने रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या मध्यस्थीने कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मेरिटाईम बोर्डाचा युनायटेड दूतावासाशी अरब आमिरातीच्या पत्रव्यवहार सुरू आहे.महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन), जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींच्या साहाय्याने जहाजावरील जळके ऑईल काढण्यात आले. त्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे जहाज काढणार असल्याचे निश्चित झाले आहे; मात्र त्यातही तांत्रिक अडचणी आल्याने काेट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. खर्चामुळे एजन्सीने जहाज काढण्याबाबत अनुत्सुकता दाखवली.अनेक अडचणी आल्याने गेल्या तीन वर्षांपासून हे जहाज अद्यापही मिऱ्या समुद्र किनाऱ्यावरच पावसासह लाटांचा मारा झेलत उभे आहे. त्याबाबत अजूनही कोणताही तोडगा काढण्यात आले नाही.

केंद्राकडून तांत्रिक मंजुरी नाहीहे जहाज भंगारात काढण्यासाठी गाेव्याच्या एजन्सीशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर स्थानिक पातळीवरील काही लाेकांना एकत्र येत याचा ठेका घेण्याचे ठरविले. स्थानिक एजन्सीकडून हे जहाज काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार हाेते. मात्र, केंद्राकडून तांत्रिक मंजुरी न मिळाल्याने ते कामही रखडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी