शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन व्यवसायाचे स्वप्न अधुरेच...- मंदा धाडवे यांना अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 15:47 IST

धरण फुटल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. आता उभे रहायलाही जागा नाही. ज्या घरात संसार केला ते घरही राहिले नाही, शेती केली ती शेतीही उरली नाही? आता पुढे काय करावे? असा प्रश्न पडल्याचे सांगून त्या धाय मोकलून रडल्या.

ठळक मुद्दे तिवरेतील धरण दुर्घटनेत संपूर्ण घरच उद्ध्वस्त

रत्नागिरी : घराशेजारी धरण आहे, म्हणून नदी किनाऱ्याजवळ नवीन घर बांधले. पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. काही दिवसांपूर्वीच अद्ययावत सुविधांनी युक्त घर बांधलं. घराचं काम पूर्ण झाल्यावर मी पुण्यात गेले. येथे आल्यावर घर, वाडीची अवस्था पाहताच रडू कोसळले. पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले, अशी प्रतिक्रिया चिपळूण तालुक्यातील तिवरे - भेंदवाडीतील मंदा धाडवे यांनी व्यक्त केली.घराची परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनाही आपले रडू आवरता आले नाही. त्यांनी सांगितले की, मी व माझे कुटुंब वाचले असले तरी शेजारी गेल्याचे दु:ख मोठे आहे. धरण फुटल्याची घटना समजताच माझ्या मुलांनी तातडीने गावाकडे धाव घेतली. मला हृदयविकाराचा त्रास असल्याने मुलं सोबत आणत नव्हती. मात्र, मी हट्ट करून आले.घराशेजारी धरण असल्यामुळे पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न होते. पै-पै गोळा करून गावात घर बांधले. सिमेंट काँक्रिटचे घर बांधून काचेची तावदाने असलेल्या खिडक्या बसवल्या. घरात फ्रिज, गॅस सिलिंडरपासून लोखंडी कपाट, टेबल, खुर्च्या सर्व साहित्यांनी युक्त घर टापटीप केले होते. आता घराची अवस्था पाहून अश्रू थांबत नाहीत. खिडक्यांच्या काचा फुटून घरात पाणी शिरल्यामुळे संपूर्ण घरात चिखलच चिखल आहे. उभे राहण्यासाठीही जागा नाही, बहुतांश सामानही वाहून गेलं आहे. ज्या हेतूने घर उभारले ते स्वप्नच मुळी विरले आहे. शेजारीदेखील राहिले नाहीत, त्यामुळे आता गावात राहण्याचीही इच्छा राहिलेली नाही.यावेळी कोणी कोणाचे सांत्वन करावे, हा प्रश्न आहे. गावातील शाळेमध्ये सर्वांना ठेवण्यात आले आहे. पार्वती गायकवाड या महिलेलादेखील १४ वर्षाचा संसार उघड्यावर पडल्याचे दु:ख आहे. गेली १४ वर्षे या गावात राहत आहे. परंतु, धरण फुटल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. आता उभे रहायलाही जागा नाही. ज्या घरात संसार केला ते घरही राहिले नाही, शेती केली ती शेतीही उरली नाही? आता पुढे काय करावे? असा प्रश्न पडल्याचे सांगून त्या धाय मोकलून रडल्या.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी