शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पर्यटन व्यवसायाचे स्वप्न अधुरेच...- मंदा धाडवे यांना अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 15:47 IST

धरण फुटल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. आता उभे रहायलाही जागा नाही. ज्या घरात संसार केला ते घरही राहिले नाही, शेती केली ती शेतीही उरली नाही? आता पुढे काय करावे? असा प्रश्न पडल्याचे सांगून त्या धाय मोकलून रडल्या.

ठळक मुद्दे तिवरेतील धरण दुर्घटनेत संपूर्ण घरच उद्ध्वस्त

रत्नागिरी : घराशेजारी धरण आहे, म्हणून नदी किनाऱ्याजवळ नवीन घर बांधले. पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. काही दिवसांपूर्वीच अद्ययावत सुविधांनी युक्त घर बांधलं. घराचं काम पूर्ण झाल्यावर मी पुण्यात गेले. येथे आल्यावर घर, वाडीची अवस्था पाहताच रडू कोसळले. पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले, अशी प्रतिक्रिया चिपळूण तालुक्यातील तिवरे - भेंदवाडीतील मंदा धाडवे यांनी व्यक्त केली.घराची परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनाही आपले रडू आवरता आले नाही. त्यांनी सांगितले की, मी व माझे कुटुंब वाचले असले तरी शेजारी गेल्याचे दु:ख मोठे आहे. धरण फुटल्याची घटना समजताच माझ्या मुलांनी तातडीने गावाकडे धाव घेतली. मला हृदयविकाराचा त्रास असल्याने मुलं सोबत आणत नव्हती. मात्र, मी हट्ट करून आले.घराशेजारी धरण असल्यामुळे पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न होते. पै-पै गोळा करून गावात घर बांधले. सिमेंट काँक्रिटचे घर बांधून काचेची तावदाने असलेल्या खिडक्या बसवल्या. घरात फ्रिज, गॅस सिलिंडरपासून लोखंडी कपाट, टेबल, खुर्च्या सर्व साहित्यांनी युक्त घर टापटीप केले होते. आता घराची अवस्था पाहून अश्रू थांबत नाहीत. खिडक्यांच्या काचा फुटून घरात पाणी शिरल्यामुळे संपूर्ण घरात चिखलच चिखल आहे. उभे राहण्यासाठीही जागा नाही, बहुतांश सामानही वाहून गेलं आहे. ज्या हेतूने घर उभारले ते स्वप्नच मुळी विरले आहे. शेजारीदेखील राहिले नाहीत, त्यामुळे आता गावात राहण्याचीही इच्छा राहिलेली नाही.यावेळी कोणी कोणाचे सांत्वन करावे, हा प्रश्न आहे. गावातील शाळेमध्ये सर्वांना ठेवण्यात आले आहे. पार्वती गायकवाड या महिलेलादेखील १४ वर्षाचा संसार उघड्यावर पडल्याचे दु:ख आहे. गेली १४ वर्षे या गावात राहत आहे. परंतु, धरण फुटल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. आता उभे रहायलाही जागा नाही. ज्या घरात संसार केला ते घरही राहिले नाही, शेती केली ती शेतीही उरली नाही? आता पुढे काय करावे? असा प्रश्न पडल्याचे सांगून त्या धाय मोकलून रडल्या.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी