शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

अवघ्या ११ मिनिटांत ८४ विषयांना नाट्यमयरीत्या मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:33 IST

चिपळूण : मागील तीन सभांच्या इतिवृत्तातील सुमारे ७० विषय व सर्वसाधारण सभेतील १४ विषयांना बुधवारी झालेल्या सभेत अवघ्या ११ ...

चिपळूण : मागील तीन सभांच्या इतिवृत्तातील सुमारे ७० विषय व सर्वसाधारण सभेतील १४ विषयांना बुधवारी झालेल्या सभेत अवघ्या ११ मिनिटांत मंजुरी देण्यात आली. यावेळी सभागृहात भाजपचे केवळ पाच सदस्य उपस्थित होते. या सभेला महाविकास आघाडीचे सर्वच सदस्य ११ मिनिटे उशिरा आल्याने हा प्रकार नाट्यमयरीत्या प्रकार घडला. याविषयी महाविकास आघाडीच्या आठ सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन संबंधित ठरावांची अंमलबजावणी झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा आक्षेप नोंदविला आहे.

येथील नगरपरिषदेच्या १८ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत महापुरामुळे शहरात निर्माण झालेल्या कचरा प्रश्नावर उशिरापर्यंत चर्चा रंगाने ही सभा तहकूब केली होती. त्यानुसार, बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा सभा घेण्यात आली. महापुरात साफसफाईचे काम करणाऱ्या सुमारे ३२५ सफाई कामगारांचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार व जीवनावश्यक वस्तू भेट देण्याचा कार्यक्रम या सभेच्या आधी झाला. कार्यक्रम नगरपरिषदेतच तळमजल्यावर होता. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी संपला. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेनेचे नगरसेवक सभेला ११ मिनिटांनी उशिरा पोहोचले. मात्र, तोपर्यंत नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली आणि इतिवृत्तातील सुमारे ७० व चालू सभेतील १४ विषयांना तत्काळ मंजुरी देत सभा गुंडाळण्यात आली. यावेळी सभागृहात नगराध्यक्षा खेराडे यांच्यासह नगरसेवक आशिष खातू, निशिकांत भोजने, रसिका देवळेकर, नुपूर बाचीम उपस्थित होते.

याच वेळी सभागृहात शिवसेना गटनेते उमेश सकपाळ, नगरसेवक शशिकांत मोदी, मोहन मिरगल, राजेश केळसकर व महाविकास आघाडीचे अन्य नगरसेवक-नगरसेविका दाखल झाल्या. मात्र, त्या आधीच अवघ्या ११ मिनिटांत इतिवृत्तातील ७० विषयी व चालू सभेतील १४ असे एकूण ८४ विषयांचे वाचन कधी झाले व त्याला मंजुरी कधी दिली, असा आक्षेप महाविकास आघाडीने घेतला, तसेच संबंधित विषय आर्थिक विषयाशी संबंधित असल्याने, भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट केले. मात्र, त्यावर मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले. या सभेत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करू नये, अन्यथा जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील व खासदार विनायक राऊत यांच्याकडे तक्रार द्यावी लागेल, असे स्पष्ट केले.

......

या ठरावांविषयी मुख्याधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली किंवा मतही नोंदविलेले नाही. त्यामुळे त्यांनी या बोगस ठरावाची अंमलबजावणी केल्यास त्यांच्याविरोधात पहिली तक्रार दिली जाईल, तसेच नगराध्यक्षा खेराडे यांचा हा दांडेलशाहीपणा असून, त्याविरुद्धही तक्रारीचे पत्र मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

- शशिकांत मोदी, नगरसेवक, चिपळूण.