शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चिपळुणात कुत्र्याने केले ११ जणांना जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:09 IST

dogs, chiplun, ratnagirinews चिपळूण शहरात पुन्हा एकदा भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील काविळतळी परिसरात शुक्रवारी सकाळी एका पिसाळलेल्या श्वानाने तब्बल ११ लोकांना चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपालिकेने तात्काळ भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देचिपळुणात कुत्र्याने केले ११ जणांना जखमी

चिपळूण : शहरात पुन्हा एकदा भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील काविळतळी परिसरात शुक्रवारी सकाळी एका पिसाळलेल्या श्वानाने तब्बल ११ लोकांना चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपालिकेने तात्काळ भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव नेहमीचा शिरस्ता राहिला आहे. शहराच्या विविध भागात झुंडीने आढळणारे श्वान काही काळानंतर पिसाळतात आणि समोर असेल त्याला चावा घेऊन जखमी करतात. वर्षभरापूर्वी अशाच प्रकारे शहरात श्वानांनी अक्षरश: थैमान घातले होते.

शालेय मुलांसह महिला आणि जेष्ठ नागरिकांनाही या श्वानांनी रक्तबंबाळ केले होते. त्यावेळी शहरात मोठी ओरड झाली आणि पालिकेने भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम राबवली होती. त्यानंतर शहरात श्वानांचा उपद्रव कमी झाला होता.शहरात अनेक भागात अक्षरश: झुंडीने श्वान आढळत आहेत. शुक्रवारी सकाळी काविळतळी परिसरात अशाच झुंडीतील श्वानाने थेट रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. एका मागोमाग एक असे तब्बल ११ लोकांना चावा घेऊन त्याने जखमी केले. हा श्वान इतका जबरदस्त पिसाळलेला होता की, चार चाकी, दुचाकी आणि रिक्षावरदेखील त्याने हल्ला चढवला. नगर परिषदेने अशा श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :dogकुत्राChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरी