शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रत्नागिरी जिल्ह्यात ४ महिन्यांत १२८८ श्वानदंशाचे रुग्ण, सर्पदंशाने एकही रुग्ण न दगावल्याचा आरोग्य यंत्रणेचा दावा

By रहिम दलाल | Updated: May 17, 2025 15:10 IST

रहिम दलाल रत्नागिरी : जिल्ह्यात श्वानदंश, सर्पदंश प्रमाण वाढले असून, गेल्या चार महिन्यांत १,२८८ जणांना श्वानदंश तर ११५ जणांना ...

रहिम दलालरत्नागिरी : जिल्ह्यात श्वानदंश, सर्पदंश प्रमाण वाढले असून, गेल्या चार महिन्यांत १,२८८ जणांना श्वानदंश तर ११५ जणांना सर्पदंश झाला आहे. तसेच इतर प्राणी म्हणजेच विंचू, मांजर, माकड, गाढव आणि कोल्हा यांनीही लोकांना चावा घेतला आहे. श्वान, सर्प आणि इतर प्राण्यांनी एकूण २,६०३ जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सापांच्या भीतीबरोबरच श्वानांची प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.शहर आणि ग्रामीण भागात उनाड कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात. सध्या शहरांमध्ये कुत्र्यांच्या नसबंदीचे प्रयोग करण्यात येत आहे. त्याचबरोबर श्वानदंश, सर्पदंश आदीवरील जिल्ह्यात लस उपलब्ध आहे.

कुत्रा, साप चावले, तरी सर्व रुग्ण बचावलेजिल्ह्यात कुत्रे, साप तसेच इतर प्राण्यांकडून माणसांवर हल्ले करून चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे वेळीच उपचार करून सर्व रुग्णांना वाचविण्यात आले आहे.

कशाकशाने घेतला चावा?कुत्र्याने चावा घेतलेले १,२८८ : जिल्ह्यात कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने लोकांची डोकेदुखी वाढलेली आहे. जिल्ह्यात गेल्या ४ महिन्यांत १२८८ जणांना चावा घेतला. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये वेळीच उपचार करण्यात आले.सापाने चावा घेतलेले ११५ : सरपटणाऱ्या प्राण्यांकडून दंश करण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात सरपटणारे प्राणी बाहेर पडतात. त्यामुळे अनेकदा चावा घेऊन लोकांना जखमी करतात. अशातच जिल्ह्यात जानेवारीपासून १५५ जणांना सर्पदंश झालेला आहे.विंचू, उंदीर  चावा घेतलेले १२०० : जिल्ह्यात श्वानदंश, सर्पदंश यांच्यासह विंचू, मांजर, उंदीर, माकड, कोल्हा व इतर प्राण्यांनी चावा घेतल्याच्या १२०० घटना घडलेल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdogकुत्राsnakeसापHealthआरोग्य