शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
5
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
6
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
7
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
8
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
9
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
10
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
11
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
12
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
13
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
14
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
15
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
16
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
17
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
18
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
19
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
20
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात ४ महिन्यांत १२८८ श्वानदंशाचे रुग्ण, सर्पदंशाने एकही रुग्ण न दगावल्याचा आरोग्य यंत्रणेचा दावा

By रहिम दलाल | Updated: May 17, 2025 15:10 IST

रहिम दलाल रत्नागिरी : जिल्ह्यात श्वानदंश, सर्पदंश प्रमाण वाढले असून, गेल्या चार महिन्यांत १,२८८ जणांना श्वानदंश तर ११५ जणांना ...

रहिम दलालरत्नागिरी : जिल्ह्यात श्वानदंश, सर्पदंश प्रमाण वाढले असून, गेल्या चार महिन्यांत १,२८८ जणांना श्वानदंश तर ११५ जणांना सर्पदंश झाला आहे. तसेच इतर प्राणी म्हणजेच विंचू, मांजर, माकड, गाढव आणि कोल्हा यांनीही लोकांना चावा घेतला आहे. श्वान, सर्प आणि इतर प्राण्यांनी एकूण २,६०३ जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सापांच्या भीतीबरोबरच श्वानांची प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.शहर आणि ग्रामीण भागात उनाड कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात. सध्या शहरांमध्ये कुत्र्यांच्या नसबंदीचे प्रयोग करण्यात येत आहे. त्याचबरोबर श्वानदंश, सर्पदंश आदीवरील जिल्ह्यात लस उपलब्ध आहे.

कुत्रा, साप चावले, तरी सर्व रुग्ण बचावलेजिल्ह्यात कुत्रे, साप तसेच इतर प्राण्यांकडून माणसांवर हल्ले करून चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे वेळीच उपचार करून सर्व रुग्णांना वाचविण्यात आले आहे.

कशाकशाने घेतला चावा?कुत्र्याने चावा घेतलेले १,२८८ : जिल्ह्यात कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने लोकांची डोकेदुखी वाढलेली आहे. जिल्ह्यात गेल्या ४ महिन्यांत १२८८ जणांना चावा घेतला. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये वेळीच उपचार करण्यात आले.सापाने चावा घेतलेले ११५ : सरपटणाऱ्या प्राण्यांकडून दंश करण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात सरपटणारे प्राणी बाहेर पडतात. त्यामुळे अनेकदा चावा घेऊन लोकांना जखमी करतात. अशातच जिल्ह्यात जानेवारीपासून १५५ जणांना सर्पदंश झालेला आहे.विंचू, उंदीर  चावा घेतलेले १२०० : जिल्ह्यात श्वानदंश, सर्पदंश यांच्यासह विंचू, मांजर, उंदीर, माकड, कोल्हा व इतर प्राण्यांनी चावा घेतल्याच्या १२०० घटना घडलेल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdogकुत्राsnakeसापHealthआरोग्य