शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का?, नीलेश राणे यांचा सामंत समर्थकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:02 IST

रत्नागिरीतील महामार्गच का रखडला

रत्नागिरी : कोणत्याही व्यक्तीवर नाही, पण व्यवस्थेवर किंवा विषयावर चर्चा झालीच पाहिजे, ती रोखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा प्रश्न माजी खासदार नीलेश राणे यांनी सामंत समर्थकांना केला आहे. रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का, असा प्रश्न करत त्यांनी सामान्य माणसावर हात उगारलेला आपण खपवून घेणार नाही, असा इशाराही प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.रत्नागिरीतील खड्ड्यांबाबत बोलावण्यात आलेली सभा सामंत समर्थकांनी उधळून लावली. याबाबत नीलेश राणे यांनी समाज माध्यमावरून कडक टीका केली आहे. याबाबत आपल्या प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी सामंत समर्थकांवर टीका करतानाच लोकांच्या प्रश्नांसाठी पुढे येण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.रस्त्याच्या बिकट अवस्थेसह अनेक प्राथमिक प्रश्नांमुळे त्रस्त झालेले रत्नागिरीतील सामान्य नागरिक रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये एकत्र येणार होते. मात्र, ही सभा होण्यापूर्वीच उधळण्यात आली. मुद्दे मांडणाऱ्यांना बोलूच न देता त्यांना धमकावण्यात आले, धक्काबुक्की करण्यात आली. या सभेत जो प्रकार झाला तो सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार असून, रत्नागिरीला १९९० मधील बिहार करायचे आहे का, असा प्रश्न राणे यांनी केला आहे.सामान्य माणसे रत्नागिरीतील व्यवस्थेबद्दल बोलायला आली होती, त्यांना व्यक्तीबद्दल बोलायचे नव्हते. तरीही त्यांना बोलू दिले नाही. सभेत जे ५०-६० जण घुसले त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली काही माणसे होती. अशा लोकांना घेऊन नागरिकांना धमकावयाचा, त्यांना घाबरावयाचा अधिकार कोणी दिला. यावर पोलीस कोणती कारवाई करणार आहेत, असा प्रश्नही राणे यांनी केला आहे.

रत्नागिरीतील महामार्गच का रखडलायाच सभेत घुसलेल्यांनी महामार्गाचा मुद्दा मांडला. त्याचा समाचार नीलेश राणे यांनी घेतला. महामार्गाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक लावा आणि महामार्गाचा केवळ रत्नागिरीचाच भाग आतापर्यंत अपूर्ण का राहिला याचाही हिशेब द्या. आम्ही उगाच कोणावर टीका करत नाही, पण आमच्या नेत्यांवर टीका केलीत तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNilesh Raneनिलेश राणे Uday Samantउदय सामंत