शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का?, नीलेश राणे यांचा सामंत समर्थकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:02 IST

रत्नागिरीतील महामार्गच का रखडला

रत्नागिरी : कोणत्याही व्यक्तीवर नाही, पण व्यवस्थेवर किंवा विषयावर चर्चा झालीच पाहिजे, ती रोखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा प्रश्न माजी खासदार नीलेश राणे यांनी सामंत समर्थकांना केला आहे. रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का, असा प्रश्न करत त्यांनी सामान्य माणसावर हात उगारलेला आपण खपवून घेणार नाही, असा इशाराही प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.रत्नागिरीतील खड्ड्यांबाबत बोलावण्यात आलेली सभा सामंत समर्थकांनी उधळून लावली. याबाबत नीलेश राणे यांनी समाज माध्यमावरून कडक टीका केली आहे. याबाबत आपल्या प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी सामंत समर्थकांवर टीका करतानाच लोकांच्या प्रश्नांसाठी पुढे येण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.रस्त्याच्या बिकट अवस्थेसह अनेक प्राथमिक प्रश्नांमुळे त्रस्त झालेले रत्नागिरीतील सामान्य नागरिक रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये एकत्र येणार होते. मात्र, ही सभा होण्यापूर्वीच उधळण्यात आली. मुद्दे मांडणाऱ्यांना बोलूच न देता त्यांना धमकावण्यात आले, धक्काबुक्की करण्यात आली. या सभेत जो प्रकार झाला तो सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार असून, रत्नागिरीला १९९० मधील बिहार करायचे आहे का, असा प्रश्न राणे यांनी केला आहे.सामान्य माणसे रत्नागिरीतील व्यवस्थेबद्दल बोलायला आली होती, त्यांना व्यक्तीबद्दल बोलायचे नव्हते. तरीही त्यांना बोलू दिले नाही. सभेत जे ५०-६० जण घुसले त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली काही माणसे होती. अशा लोकांना घेऊन नागरिकांना धमकावयाचा, त्यांना घाबरावयाचा अधिकार कोणी दिला. यावर पोलीस कोणती कारवाई करणार आहेत, असा प्रश्नही राणे यांनी केला आहे.

रत्नागिरीतील महामार्गच का रखडलायाच सभेत घुसलेल्यांनी महामार्गाचा मुद्दा मांडला. त्याचा समाचार नीलेश राणे यांनी घेतला. महामार्गाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक लावा आणि महामार्गाचा केवळ रत्नागिरीचाच भाग आतापर्यंत अपूर्ण का राहिला याचाही हिशेब द्या. आम्ही उगाच कोणावर टीका करत नाही, पण आमच्या नेत्यांवर टीका केलीत तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNilesh Raneनिलेश राणे Uday Samantउदय सामंत