शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जंगलातल्या या ‘शबरीं’साठी कोणी घर देता का... घर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 1:00 AM

संदीप बांद्रे । चिपळूण : रानावनात औषधी वनस्पती व मध पोळ्यांच्या शोधात फिरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कातकरी समाजातील दीडशे ...

संदीप बांद्रे ।चिपळूण : रानावनात औषधी वनस्पती व मध पोळ्यांच्या शोधात फिरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कातकरी समाजातील दीडशे ते दोनशे कुटुंब जागेअभावी ‘घरकुल आवास’ योजनेपासून वंचित आहेत. या कुटुंबांना शासकीय जागा उपलब्ध व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षात अवघ्या १६ जणांना ‘शबरी घरकुल आवास’ योजनेचा लाभ मिळाला आहे.या समाजातील प्रत्येक जण आपल्या संसाराचा गाडा ओढताना स्वत:चे घर असावे अशी कल्पनादेखील आपल्या मनात आणत नसावा. जिथे रोजच्या खाण्या-जगण्याचीच खात्री नाही तिथे घराचे स्वप्नही त्यांना परवडत नसावे. म्हणूनच वर्षानुवर्ष झोपडीतील जगणे त्यांनी प्रिय मानले आहे. स्वत:ची जागाच नाही तर घर कसे बांधणार, हा विचार त्यांच्या मनात ठासून भरलेला असल्यानेच घराची कल्पना त्यांच्या मनाला शिवत नसावी.वर्षानुवर्षे या समाजाची पिढी येथे वाढत आहे. आजही अनेक कुटुंबांचे स्वत:चे घर नाही. जागा मिळेल तेथे वास्तव्य करून प्रत्येकजण जीवन जगत आहे. तालुक्यात अशी सुमारे दीडशे ते दोनशे कुटुंब असल्याची माहिती आदिवासी आदिम कातकरी संघटनेमार्फत देण्यात आली आहे.कातकरी समाजाच्या घरकुलांसाठी शासनामार्फत ‘शबरी आवास योजना’ राबवली जाते. मात्र, या योजनेचा गेल्या तीन वर्षात अवघ्या १६ जणांनी लाभ घेतला आहे. २०१६-१७ मध्ये १४ जण, २०१७-१८ व २०१८-१९मध्ये प्रत्येकी एक घरकुल आकले, नांदिवसे, तिवरे व कुंभार्ली येथे उभारण्यात आले. संबंधित जमीनमालकाने बक्षीसपत्रामार्फत जागा दिल्याने हा प्रश्न सुटला. तसेच तत्कालिन तहसीलदार जीवन देसाई यांच्या प्रयत्नांतून काही कुटुंबांच्या घराखालील जमीन त्यांच्या नावे करण्यात आल्याने काहींना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. योजना त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही, हाच आता प्रश्न आहे.शेतात मजुरी, औषधी वनस्पती, मध आणि मासेचिपळूण तालुक्यातील मुंढे तर्फे चिपळूण, कुटरे, निरबाडे, नांदगाव, मांडकी बुद्रुक, आकले, तिवरे, नांदिवसे, कुंभार्ली, कादवड, रिक्टोली, गाणे, कळकवणे, ओवळी, पिंपरी खुर्द, बौद्धवाडी, पेढांबे, नागावे आदी गावांमध्ये कातकरी समाजाची लोकवस्ती आहे. एखाद्या गावातील जमीनदाराच्या जागेत वस्ती करून त्याची शेती-वाडीची कामे करायची आणि आपला घरसंसार चालवायचा. तसेच वेळ पडल्यास रानात जाऊन औषधी वनस्पती व मध पोळ्यांचा शोध घेऊन त्यातून थोडीफार कमाई करुन आपल्या झोपडीत पुन्हा विसावा घ्यायचा, हा या समाजाचा नित्यक्रम असतो. त्याचबरोबर गावच्या नदीत जाऊन मासेमारी करणे हादेखील या समाजाचा व्यवसाय मानला जातो. अर्थात त्यातून फारच तुटपुंजे उत्पन्न त्यांच्या वाट्याला येते.