शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्याचा अडीचशे कोटींचा आराखडा; शासनाकडून ७३ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:36 IST

रत्नागिरी : जिल्हयाला २०२१-२२ साठी २५० कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यातील ४३ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय ...

रत्नागिरी : जिल्हयाला २०२१-२२ साठी २५० कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यातील ४३ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी ७२ कोटी ९९ लाख ५७ हजार इतका निधी जिल्ह्याला मिळाला आहे. यापैकी २८ कोटी २१ लाख ९१ हजार इतका निधी विविध यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. जिल्हा नियोजनच्या निधीतून आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची २०२१-२२ या वर्षातील पहिली बैठक झाली. या बैठकीवेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, भास्कर जाधव, शेखर निकम, योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाले होते.

या बैठकीत पुढीलप्रमाणे कार्यवाही झाली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी २११ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. गतवर्षी संपूर्ण निधी जिल्ह्याला मिळाला. २१० कोटी ६० लाख ८१ हजारांचा निधी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. विशेष घटक योजनेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तरतूद असलेला १७ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, त्यापैकी १७ कोटी ६८ लाख ६५ हजार खर्च झाले आहेत.

...............................

गतवर्षीचा कोविडअंतर्गत खर्च...

नियोजन विभागाच्या मंजूर निधीच्या १६.५ टक्के (३४.८१) कोटी इतका निधी राखून ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार १३ कोटी ९५ लाख ४७ हजार निधी वितरित करण्यात आला आहे.

.............................

कोरोनासाठी ३० टक्के निधी...

जिल्हयाचा मंजूर अर्थसंकल्पित नियतव्यय २५० कोटी रुपयांचा आहे. यात पूर्व दायित्व ५७ कोटी ८६ लाख ६२ हजार इतके आहे. गाभा व बिगर गाभा क्षेत्रासाठी २४१ कोटी तर ४.५ टक्के रक्कम नावीन्यपूर्ण योजनांसाठी आहे. तथापि नियोजन विभागाकडील ७ मे २०२० रोजीच्या सूचनेनुसार मंजूर निधींपैकी ७५ कोटी (३० टक्के) कोरोना उपाययोजनासाठी खर्च करण्याच्या सूचना आहेत. आतापर्यंत २८ कोटी १४ लाख ९४ हजार इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे.

...............

आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी गतवर्षी १ कोटी ८ लाख ९१ हजार रुपये निधी मिळाला. त्यापैकी १ कोटी ४ लाख ९६ हजार रुपये खर्च झाले. चालू आर्थिक वर्षाकरिताही १ कोटी ८ लाख ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

..........................

अतिवृष्टीसाठी तरतूद खर्च...

जिल्ह्यात २२ ते २५ जुलै या कालावधीत झालेल्या पूरपरिस्थिती - अतिवृष्टीअंतर्गत झालेल्या तात्काळ उपाययोजनेच्या अनुषंगाने आतापर्यंत ४ कोटी ५६ लाख ८१ हजार इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.