शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:28 IST

funds, farmar, ratnagirinews जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांना शेती तसेच बागायतीच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी ७ कोटी ९ लाख रूपयांचा निधी सर्व तालुक्यांकडे वितरीत करण्यात आला आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटपसाडेनऊ कोटी जादा रकमेची शासनाकडे मागणी

रत्नागिरी : जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांना शेती तसेच बागायतीच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी ७ कोटी ९ लाख रूपयांचा निधी सर्व तालुक्यांकडे वितरीत करण्यात आला आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.यावर्षी जून ते ऑक्टोबर याकाळात निसर्ग वादळासह अनेकवेळा झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान केले. यावर्षी सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या पावसाचा मुक्काम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबला.

याकाळात झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांच्या ११,८१२.५७ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान केले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी साडेआठ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. या निधीतून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्यात आली होती.सुरूवातीला शासनाने जिरायती शेतीसाठी प्रतिहेक्टर ६,८०० रुपये आणि बागायतीसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रूपये भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोकणातील शेती ही प्रामुख्याने काही गुंठ्यांवर असल्याने भरपाईची रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून करण्यात आली. त्यामुळे शासनाने ही रक्कम वाढवून जिरायतीसाठी प्रतिहेक्टर १० हजार रुपये आणि बागायतींसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रूपये एवढी केली.त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत एकूण ७ कोटी ९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीचे वाटप सध्या सुरू आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. अद्यापही काही शेतकऱ्यांनी नुकसानाबाब ऑनलाईन तक्रारी दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे वाटपात अडचणी येत आहेत.खातेदार अनेकबाधित शेतकऱ्यांपैकी काहींचे वास्तव्य मुंबईत आहे. त्याचप्रमाणे सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा अधिक खातेदार असल्याने भरपाई रकमेचे वाटप करण्यात अडचणी येत आहेत.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी