शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
5
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
6
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
7
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
8
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
9
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
10
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
11
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
12
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
13
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
14
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
15
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
16
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
17
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
18
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
19
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
20
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:28 IST

funds, farmar, ratnagirinews जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांना शेती तसेच बागायतीच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी ७ कोटी ९ लाख रूपयांचा निधी सर्व तालुक्यांकडे वितरीत करण्यात आला आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटपसाडेनऊ कोटी जादा रकमेची शासनाकडे मागणी

रत्नागिरी : जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांना शेती तसेच बागायतीच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी ७ कोटी ९ लाख रूपयांचा निधी सर्व तालुक्यांकडे वितरीत करण्यात आला आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.यावर्षी जून ते ऑक्टोबर याकाळात निसर्ग वादळासह अनेकवेळा झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान केले. यावर्षी सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या पावसाचा मुक्काम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबला.

याकाळात झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांच्या ११,८१२.५७ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान केले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी साडेआठ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. या निधीतून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्यात आली होती.सुरूवातीला शासनाने जिरायती शेतीसाठी प्रतिहेक्टर ६,८०० रुपये आणि बागायतीसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रूपये भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोकणातील शेती ही प्रामुख्याने काही गुंठ्यांवर असल्याने भरपाईची रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून करण्यात आली. त्यामुळे शासनाने ही रक्कम वाढवून जिरायतीसाठी प्रतिहेक्टर १० हजार रुपये आणि बागायतींसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रूपये एवढी केली.त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत एकूण ७ कोटी ९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीचे वाटप सध्या सुरू आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. अद्यापही काही शेतकऱ्यांनी नुकसानाबाब ऑनलाईन तक्रारी दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे वाटपात अडचणी येत आहेत.खातेदार अनेकबाधित शेतकऱ्यांपैकी काहींचे वास्तव्य मुंबईत आहे. त्याचप्रमाणे सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा अधिक खातेदार असल्याने भरपाई रकमेचे वाटप करण्यात अडचणी येत आहेत.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी