शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:28 IST

funds, farmar, ratnagirinews जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांना शेती तसेच बागायतीच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी ७ कोटी ९ लाख रूपयांचा निधी सर्व तालुक्यांकडे वितरीत करण्यात आला आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटपसाडेनऊ कोटी जादा रकमेची शासनाकडे मागणी

रत्नागिरी : जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांना शेती तसेच बागायतीच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी ७ कोटी ९ लाख रूपयांचा निधी सर्व तालुक्यांकडे वितरीत करण्यात आला आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.यावर्षी जून ते ऑक्टोबर याकाळात निसर्ग वादळासह अनेकवेळा झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान केले. यावर्षी सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या पावसाचा मुक्काम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबला.

याकाळात झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांच्या ११,८१२.५७ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान केले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी साडेआठ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. या निधीतून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्यात आली होती.सुरूवातीला शासनाने जिरायती शेतीसाठी प्रतिहेक्टर ६,८०० रुपये आणि बागायतीसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रूपये भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोकणातील शेती ही प्रामुख्याने काही गुंठ्यांवर असल्याने भरपाईची रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून करण्यात आली. त्यामुळे शासनाने ही रक्कम वाढवून जिरायतीसाठी प्रतिहेक्टर १० हजार रुपये आणि बागायतींसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रूपये एवढी केली.त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत एकूण ७ कोटी ९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीचे वाटप सध्या सुरू आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. अद्यापही काही शेतकऱ्यांनी नुकसानाबाब ऑनलाईन तक्रारी दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे वाटपात अडचणी येत आहेत.खातेदार अनेकबाधित शेतकऱ्यांपैकी काहींचे वास्तव्य मुंबईत आहे. त्याचप्रमाणे सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा अधिक खातेदार असल्याने भरपाई रकमेचे वाटप करण्यात अडचणी येत आहेत.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी