शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

पालखीच्या वाटेवरून वाद, चिपळुणात एकावर खूनी हल्ला; शिमगोत्सवाच्या बैठकीतच घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:08 IST

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात गावची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भोजने यांच्या दोन कुटुंबातील वाटेवरून सुरु असलेला वाद उफाळून आला.

चिपळूण : काही दिवसांवरच शिमगोत्सव येऊन ठेपला असून सर्वत्र त्याची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध देवस्थानच्या बैठका सुरु झाल्या आहेत. शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात बैठक सुरू असताना पालखीच्या वाटेवरून वाद झाला आणि त्यातून एकावर खूनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ला झालेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकारानंतर गावात एकच खळबळ उडाली.गेली दोन वर्ष कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वत्र शिमगोत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे अनेक ठिकाणी साध्या पद्धतीने तर काही ठिकाणी उत्सव साधना करतात मंदिरातच शिमगोत्सव साजरा करावा लागला होता. मात्र आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने सर्वत्र शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या उत्सवासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमानी देखील कोकणच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय देवस्थान मार्फत शिमगोत्सवाची तयारी केली जात आहे.शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात गावची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भोजने यांच्या दोन कुटुंबातील वाटेवरून सुरु असलेला वाद उफाळून आला. या वादा विषयी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मात्र शिमगोत्सवानिमित्त पालखीची वाट मोकळी करावी अशी मागणी एका कुटुंबाने केली.या रागातून एकाने चक्क त्याच्याच चुलत भावाच्या पोटात चाकू सारख्या धारदार हत्याराने वार केला. या प्रकारामुळे बैठकीला असलेले सर्व ग्रामस्थ भयभीत झाले होते. तर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला झालेली व्यक्ती गंभीरपणे जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी