शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

रत्नागिरीत बक्षीसपत्राविना विहिरींची कामे अडकली, पंचायत समिती सभेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 5:43 PM

नाविन्यपूर्ण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेमधून सुरु असलेल्या विहिरींच्या कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र, ग्रामपंचायतींकडून बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनेतील २१ विहिरींची कामे अडकल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत स्पष्ट केले़ ही बक्षीसपत्रे करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढे यावे, असे आवाहन प्रभारी सभापती सुनील नावले यांनी आजच्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत केले़

ठळक मुद्देरत्नागिरी पंचायत समिती सभेत चर्चाग्रामीण पाणीपुरवठाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती

रत्नागिरी : नाविन्यपूर्ण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेमधून सुरु असलेल्या विहिरींच्या कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र, ग्रामपंचायतींकडून बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनेतील २१ विहिरींची कामे अडकल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत स्पष्ट केले़ ही बक्षीसपत्रे करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढे यावे, असे आवाहन प्रभारी सभापती सुनील नावले यांनी आजच्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत केले़ही सभा प्रभारी सभापती नावले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला़ ह्यउन्नत शेती, समृध्द शेतकरीह्ण या योजनेंतर्गत ५३९ शेतकऱ्यांचे पॉवर स्प्रे व ग्रासकटर अनुदान जमा करण्यात आले आहे़ तालुक्यातील कासारवेली गावाची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड झाल्याचे यावेळी रोजगार हमी योजनेच्या अधिकाºयांनी सांगितले़चालू शैक्षणिक वर्षात रत्नागिरी तालुक्यात २ हजार २८८ विद्यार्थ्यांनी पहिली इयत्तेत प्रवेश घेतला आहे़ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले असले तरी काही विषयांची पुस्तके नुकतीच उपलब्ध झाली असून, ती पुढील आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहेत़.

तालुक्यातील नाखरे-उंबरवाडी येथील शाळेची पटसंख्या केवळ ३ असल्याने, शासन निर्णयानुसार ही शाळा बंद करावी लागणार आहे़ परंतु, सद्यस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने ही पटसंख्या १२ एवढी झाली असली तरी किमान २० पटसंख्या असेल तर ही शाळा सुरू ठेवता येणार आहे़ त्यामुळे यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी भाग्यश्री हिरवे यांनी सभागृहात स्पष्ट केले़नाविन्यपूर्ण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत तालुक्याला विहिरींची कामे मंजूर झाली आहेत़ त्यासाठी १० लाखांचा निधीही उपलब्ध झाला आहे़ परंतु, विहिरींसाठी लागणारी जागा बक्षीसपत्र नसल्यामुळे या योजनेतील २१ विहिरींची कामे होऊ शकलेली नाहीत. त्यामध्ये सभागृहाने लक्ष घालावे, अशी विनंती यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी केली़

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीRatnagiriरत्नागिरी