शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रत्नागिरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणार : पालकमंत्री उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: July 22, 2023 18:51 IST

१ कोटी रुपयांची तरतूद करणार

रत्नागिरी : अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणे, वादळ अशा सर्वच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष अत्याधुनिक असणे आवश्यक आहे. आपण रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती कक्षाचे डिजिटलायझेशन करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री सामंत यांनी सकाळच्या सत्रातच या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाला अधिक महत्त्व आले आहे. कोठेही आपत्ती ओढवते तेव्हा या कक्षाकडूनच सर्व गोष्टींचे नियंत्रण केले जाते. त्यासाठी येथील संपर्क यंत्रणा सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याचे डिजिटलायझेशन गरजेचे आहे. या कक्षाकडून प्रत्येक तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्याशी थेट संपर्क साधला जावा, यासाठी हॉटलाईनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अन्य संपर्क यंत्रणाही आधुनिक करण्याची गरज आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.या कामासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने अधिकाऱ्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला नव्हता. इतक्या मोठ्या निधीची तरतूद कशी होणार, असा त्यांच्यासमोरील प्रश्न होता. मात्र आता निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. त्यामुळे लवकरच हे काम हाती घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत