शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात साकारणार डिजिटल लायब्ररी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 15:51 IST

रत्नागिरीतत १८२८ साली स्थापन झालेलं हे वाचनालय १४ जानेवारी २०१९ रोजी १९१ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानंतर १० वर्षांनी ही संस्था २०० वर्षांची होईल. शतकोत्तर शतकात वाचनालयाचा जुना इतिहास, जुने संदर्भ संकलित करण्याचा मनोदय जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर डिजिटल युगाची नवी लायब्ररी या संदर्भाने अधिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

ठळक मुद्देशतकोत्तर शतक महोत्सव - दीपक पटवर्धन यांचा संकल्पवाचनालयाचा जुना इतिहास, जुने संदर्भ एकत्रित करण्याचा प्रयत्न

अरूण आडिवरेकररत्नागिरी : रत्नागिरीतत १८२८ साली स्थापन झालेलं हे वाचनालय १४ जानेवारी २०१९ रोजी १९१ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानंतर १० वर्षांनी ही संस्था २०० वर्षांची होईल. शतकोत्तर शतकात वाचनालयाचा जुना इतिहास, जुने संदर्भ संकलित करण्याचा मनोदय जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर डिजिटल युगाची नवी लायब्ररी या संदर्भाने अधिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.याबाबत माहिती देताना दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, सलग प्रदीर्घ काळ हे वाचनालय सुरू असून, ग्रंथ वाचकांची वाचनतृष्णा अखंड भागवत आहे. आज वाचनसंस्कृती लोप पावते की काय, अशी चिंता अनेकजण व्यक्त करतात. परंतु, वाचन अखंड सुरू राहणार आहे.

कदाचित पृष्ठांकित ग्रंथांची जागा इलेक्ट्रॉनिक साधनांनी पूर्णांशाने घेतलेली असेल, पण साहित्य निर्मिती ही होतच राहील. कारण तहान पाण्याची असो की वाचनाची ती अव्याहत राहते. हेच या ग्रंथालयाच्या २०० वर्षांच्या वाटचालीकडे पाहिल्यावर अधिक तीव्रतेने पटते.महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या वाचनालयांपैकी हे वाचनालय असून, ते आपल्या कोकणात, आपल्या रत्नागिरीत आहे, याचा अभिमान आपल्याला नक्की आहे. समृद्ध वाचनालय हे त्या शहराची सुसंस्कृतता अधोरेखित करते. ग्रंथालयासारख्या सरस्वतीची आराधना करणाऱ्या संस्था, ज्या शहराने १९१ वर्ष जोपासल्या.

केवळ राजाश्रय मिळून संस्था विकसित होत नाहीत तर जागृत, उच्च अभिरुची जोपासणाऱ्या समाजाच्या सहभागानेच वाचनालये टिकून राहतात आणि असं वाचनालय १९१ वर्षे आपली साथ करतंय. त्यामुळे समस्त रत्नागिरीकरांसाठी हे वाचनालय अभिमानास्पद आहे.१९० वर्ष पूर्ण होत असताना, २०० वर्षांचा सुवर्णक्षण साजरा करण्याची आतुरता लपवता येत नाही. २९९ वर्ष पूर्ण करताना हे वाचनालय कशा स्वरूपात असावे, भौतिक स्वरूप, उत्तम वास्तू अद्ययावत असावी, नवीन तंत्रज्ञान साधने असावीत, अभ्यासिका अद्ययावत असावी, ग्रंथसंपदा वृद्धिंगत होत राहावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.

या वाचनालयाची वाचक संख्या १० वर्षात किमान २५ हजार होईल, युवक वाचक, विद्यार्थी वाचक यांना या वाचनालयाचे कसे आकर्षण वाटेल, असे वाचनालयाचे स्वरूप उभे करणे, या जुन्या ग्रंथसंपदेला संरक्षित करत ही जुनी ग्रंथसंपदा जगभरातील वाचकांना उपलब्ध होईल यासाठी तंत्रज्ञानाचा प्रबंध करणे, असे अनेक उपक्रम मनात असल्याचे त्यांनी सांगितले.विविध समित्या स्थापणार२०० वर्ष साजरी करताना संस्मरणीय गोष्टींनी हे वाचनालय कसे समृद्ध करावे, याची योजना आखण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरीकरांबरोबरच महाराष्ट्रातले साहित्यिक, प्रकाशक, कलाकार, राजकीय नेते, उद्योजक, शिक्षक, प्राध्यापक, प्रामुख्याने युवक, पत्रकार आणि सर्व ग्रंथप्रेमी नागरिक या सर्वांनी वैचारिक योगदान करावे. युवकांच्या पुढाकाराने विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :libraryवाचनालयRatnagiriरत्नागिरी