शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड तालुक्यात पाण्यासारखा पैसा खर्च, तरी पाण्याची समस्या कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:06 IST

प्रशांत सुर्वे मंडणगड : जलजीवन मिशनसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून तालुक्यात पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पाणीटंचाईची समस्या मात्र वर्षानुवर्षे तशीच ...

प्रशांत सुर्वेमंडणगड : जलजीवन मिशनसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून तालुक्यात पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पाणीटंचाईची समस्या मात्र वर्षानुवर्षे तशीच आहे. तालुक्यातील कागदावर असलेली लोकसंख्या व वास्तवात असलेली लोकसंख्या यात तफावत आहे. ५० टक्क्यांहून अधिक लोक तालुक्याबाहेर आहेत. त्यामुळे टंचाईचे सावट तुलनेने कमी जाणवत आहे. कागदावर आहेत, तेवढे लोक प्रत्यक्षात त्या - त्या गावांमध्ये असते तर टंचाईचे हे चित्र अधिक भीषण झाले असते.मंडणगड पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी यंदा काहीशा विलंबाने पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. यात तालुक्यातील ३१ गावातील ३७ वाड्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याकरिता १ कोटी २३ लाख इतका निधी खर्च होणे अपेक्षित आहे. मार्च महिन्याचा विलंब लक्षात घेता दोन टप्प्यात याकरिता काम केले जाणार आहे.टंचाई कृती आराखड्यात नवीन विंधन विहीर खणणे, जुन्या नळपाणी योजनांची दुरुस्ती करणे, तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना सुरू करणे व आवश्यकता भासल्यास टँकरचा पाणी पुरवठा करण्यासाठीही निधीचे नियोजन करण्यात आले आहे. तीव्र टंचाईच्या काळात तालुक्यातील पाच गावातील सात वाड्यांवर दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. विविध नळपाणी योजनांची सातत्याने अंमलबजावणी करूनही पाण्याची गैरसोय दूर झालेली नसल्याची तक्रार तालुक्यातून नेहमीच केली जाते.

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ८०हून अधिक गावात प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा करीत आहेत. या योजनेची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाल्याची अनेकांची तक्रार आहे. त्याचेच प्रतिबिंब टंचाई आखड्यात दिसत आहे. या पुढील काळात या यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. टंचाई आराखड्यात १३ गावातील १४ वाड्यांमध्ये नवीन विंधन विहीर, एका गावातील एका वाडीवर विंधन विहीर दुरुस्ती, १० गावातील १३ वाड्यांवर नळयोजना दुरुस्ती, ५ गावातील ६ वाड्यांवर तात्पुरत्या पूरक नळपाणी योजनेचे काम प्रस्तावित आहे. याखेरीज २ गावातील ३ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणे यंत्रणेनेच अपेक्षित धरले आहे.तालुक्यातील तिडे, भोळवली, तुळशी, चिंचाळी या धरणातील पाण्याचा थेट वापर केला जात नाही. मात्र, या धरणामुळे या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. तिडे धरणवगळता भोळवली व तुळशी धरणातील पाण्याचा शेतीसाठीही उपयोग होत नाही. जुन्या धरणांचे कालवे बुजून गेले आहेत. त्यामुळे गावालगत धरण असूनही गावात पाणी नाही, अशी स्थितीही दिसते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी