शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus In Ratnagiri : पॉझिटिव्ह असूनही चढला बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 15:24 IST

CoronaVirus Ratnagiri: लग्नासाठी सज्ज असलेला नवरदेवच चक्क पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील शीर येथे बुधवारी घडला़ बरं, आपण पॉझिटिव्ह आहोत हे माहित असूनही नवरदेव बोहोल्यावर चढल्याने २३ जणांवर गृह अलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे़ तर वऱ्हाडी मंडळींना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह असूनही चढला बोहल्यावर गुहागरात वऱ्हाडी मंडळींना ५० हजारांचा दंड

गुहागर : लग्नासाठी सज्ज असलेला नवरदेवच चक्क पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील शीर येथे बुधवारी घडला़ बरं, आपण पॉझिटिव्ह आहोत हे माहित असूनही नवरदेव बोहोल्यावर चढल्याने २३ जणांवर गृह अलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे़ तर वऱ्हाडी मंडळींना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील मुलाचे लग्न शीरमधील मुलीबरोबर ठरले होते. हा विवाह ५ मे रोजी होता़ विवाहासाठी प्रांताधिकारी यांच्याकडून परवानगी घेण्यात आली होती. त्यातील अटीप्रमाणे वधुवराकडील मंडळींनी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ मे रोजी कोरोनाची तपासणीही केली होती. प्रांतांनी दिलेल्या परवानगीची एक प्रत शीर ग्रामपंचायतीलाही देण्यात आली होती.

गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सजग असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने वधुकडील मंडळींचे कोरोना तपासणी अहवाल आधीच तपासले होते. ५ मे रोजी शीरचे सरपंच विजय धोपट, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत पवार, तलाठी बी. एच. राठोड, ग्रामसेवक एकनाथ पाटील, पोलीस पाटील संदीप घाणेकर हे सर्वजण विवाहस्थळी गेले होते.विवाहादरम्याने वरपक्षाकडे कोरोना तपासणीचा अहवाल मागण्यात आला. त्यावेळी आम्ही चाचणी केली असून, अजून अहवाल आलेला नसल्याचे सांगण्यात आले. विवाह सोहळ्यात विघ्न नको म्हणून प्रशासनाने अधिक चौकशी न करता प्रांतांच्या आदेशाप्रमाणे विवाह पार पाडा, अशी सूचना दिली़.

वरपक्षाकडील कोरोना चाचणीची खात्री करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांनी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली. त्यावेळी नवरदेव कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच प्रशासकीय पथक विवाहस्थळी दाखल झाले आणि या पथकाने वरपक्षाकडे चौकशी सुरू केली. दाखल्याची मागणी केली.अखेर वराने आपण कोरोनाबाधित असल्याची कबुली दिली. ही बाब उघड होताच शासकीय पथकाने नवरदेव कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याने साथ रोग नियंत्रण प्रसाराबद्दल असा उल्लेख करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच नवरा मुलगा कोरोनाबाधित असल्याने सर्वांना तातडीने गृह अलगीकरणात जाण्याच्या सक्त सूचना दिल्या़ या कारवाईनंतर नवरदेव कोरोनाबाधित असतानाही शीरमधील मंडळींनी वधुची सासरी पाठवणी केली आहे. तर नवरदेवासह सर्वांची वरात गृह अलगीकरणात पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नRatnagiriरत्नागिरी