शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

चिपळूणमधील विद्यार्थी प्रवास भत्त्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 12:02 IST

संदीप बांद्रे चिपळूण : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी वार्षिक तीन हजार रुपये ...

संदीप बांद्रेचिपळूण : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी वार्षिक तीन हजार रुपये प्रवास भत्ता दिला जातो. मात्र, या प्रवास भत्त्याची मागणी करूनही निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या १८ शाळांमधील सुमारे ७० विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा शाळांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार जातो. सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून हा उपक्रम राबवला जातो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. तूर्तास तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या १८ शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा मुद्दा चिपळूण पंचायत समितीच्या सभेत चर्चेला आला होता. यावेळी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करताना त्यांना मासिक तीन हजार रुपये प्रवास भत्त्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.

याविषयी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी सांगितले की, सर्व शिक्षा अभियानांतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांना उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण देऊन शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे हा मुख्य उद्दिष्ट आहे. एखाद्या भागातील चार विद्यार्थी दोन किलोमीटर अंतरावर जात असतील, तर त्यांचे एकत्रित १२ हजार रुपये जमा होतील. ती रक्कम एखाद्या रिक्षा व्यावसायिकाला महिना एक हजार रुपये देऊन शिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. तसेच त्यासाठी पालकांचीही मानसिकता तयार होऊ शकते. अन्यथा आपल्या लहान मुलांना इतक्या दूर अंतरावर पाठविण्यास कोणीही तयार होत नाहीत. ग्रामीण भागात हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. याविषयी शिक्षण विभागाप्रमाणेच त्या-त्या विभागातील पालकांनी जागरुक होण्याची गरज आहे.

--------------------

वर्षभरापूर्वीच प्रस्ताव सादर

वर्षभरापूर्वीच डिसेंबर महिन्यात संबंधित विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आजतागायत हा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना स्वखर्चाने अथवा पायपीट करत शिक्षणाचा लाभ घ्यावा लागत आहे. तर काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

----------------------

सर्व शिक्षा अभियानांतर्गत केवळ २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो. या अभियानांतर्गत तशी तरतूद आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास भत्त्याचा लाभ मिळाला नाही; मात्र डिसेंबर महिन्यात पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

- दादासाहेब इरणाक, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थी