शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

चिपळूणमधील विद्यार्थी प्रवास भत्त्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 12:02 IST

संदीप बांद्रे चिपळूण : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी वार्षिक तीन हजार रुपये ...

संदीप बांद्रेचिपळूण : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी वार्षिक तीन हजार रुपये प्रवास भत्ता दिला जातो. मात्र, या प्रवास भत्त्याची मागणी करूनही निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या १८ शाळांमधील सुमारे ७० विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा शाळांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार जातो. सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून हा उपक्रम राबवला जातो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. तूर्तास तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या १८ शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा मुद्दा चिपळूण पंचायत समितीच्या सभेत चर्चेला आला होता. यावेळी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करताना त्यांना मासिक तीन हजार रुपये प्रवास भत्त्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.

याविषयी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी सांगितले की, सर्व शिक्षा अभियानांतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांना उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण देऊन शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे हा मुख्य उद्दिष्ट आहे. एखाद्या भागातील चार विद्यार्थी दोन किलोमीटर अंतरावर जात असतील, तर त्यांचे एकत्रित १२ हजार रुपये जमा होतील. ती रक्कम एखाद्या रिक्षा व्यावसायिकाला महिना एक हजार रुपये देऊन शिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. तसेच त्यासाठी पालकांचीही मानसिकता तयार होऊ शकते. अन्यथा आपल्या लहान मुलांना इतक्या दूर अंतरावर पाठविण्यास कोणीही तयार होत नाहीत. ग्रामीण भागात हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. याविषयी शिक्षण विभागाप्रमाणेच त्या-त्या विभागातील पालकांनी जागरुक होण्याची गरज आहे.

--------------------

वर्षभरापूर्वीच प्रस्ताव सादर

वर्षभरापूर्वीच डिसेंबर महिन्यात संबंधित विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आजतागायत हा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना स्वखर्चाने अथवा पायपीट करत शिक्षणाचा लाभ घ्यावा लागत आहे. तर काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

----------------------

सर्व शिक्षा अभियानांतर्गत केवळ २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो. या अभियानांतर्गत तशी तरतूद आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास भत्त्याचा लाभ मिळाला नाही; मात्र डिसेंबर महिन्यात पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

- दादासाहेब इरणाक, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थी