शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमधील विद्यार्थी प्रवास भत्त्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 12:02 IST

संदीप बांद्रे चिपळूण : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी वार्षिक तीन हजार रुपये ...

संदीप बांद्रेचिपळूण : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी वार्षिक तीन हजार रुपये प्रवास भत्ता दिला जातो. मात्र, या प्रवास भत्त्याची मागणी करूनही निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या १८ शाळांमधील सुमारे ७० विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा शाळांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार जातो. सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून हा उपक्रम राबवला जातो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. तूर्तास तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या १८ शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा मुद्दा चिपळूण पंचायत समितीच्या सभेत चर्चेला आला होता. यावेळी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करताना त्यांना मासिक तीन हजार रुपये प्रवास भत्त्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.

याविषयी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी सांगितले की, सर्व शिक्षा अभियानांतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांना उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण देऊन शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे हा मुख्य उद्दिष्ट आहे. एखाद्या भागातील चार विद्यार्थी दोन किलोमीटर अंतरावर जात असतील, तर त्यांचे एकत्रित १२ हजार रुपये जमा होतील. ती रक्कम एखाद्या रिक्षा व्यावसायिकाला महिना एक हजार रुपये देऊन शिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. तसेच त्यासाठी पालकांचीही मानसिकता तयार होऊ शकते. अन्यथा आपल्या लहान मुलांना इतक्या दूर अंतरावर पाठविण्यास कोणीही तयार होत नाहीत. ग्रामीण भागात हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. याविषयी शिक्षण विभागाप्रमाणेच त्या-त्या विभागातील पालकांनी जागरुक होण्याची गरज आहे.

--------------------

वर्षभरापूर्वीच प्रस्ताव सादर

वर्षभरापूर्वीच डिसेंबर महिन्यात संबंधित विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आजतागायत हा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना स्वखर्चाने अथवा पायपीट करत शिक्षणाचा लाभ घ्यावा लागत आहे. तर काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

----------------------

सर्व शिक्षा अभियानांतर्गत केवळ २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो. या अभियानांतर्गत तशी तरतूद आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास भत्त्याचा लाभ मिळाला नाही; मात्र डिसेंबर महिन्यात पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

- दादासाहेब इरणाक, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थी