शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

येडगेवाडी विद्यार्थ्यांची सलग दुसऱ्या दिवशीही शाळेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:29 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील विद्यार्थ्यांची सध्या एस. टी. अभावी गैरसोय होत असून दिवाळीची सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत निघाले खरे; मात्र पहिल्या दिवशी एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली होती. रत्नागिरी विभागीय नियंत्रकांनी याची दखल घेवून बसफेरी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देएस. टी. महामंडळाचा असहकार सुरुच विद्यार्थ्यांचे हाल, प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील विद्यार्थ्यांची सध्या एस. टी. अभावी गैरसोय होत असून दिवाळीची सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत निघाले खरे; मात्र पहिल्या दिवशी एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली होती. रत्नागिरी विभागीय नियंत्रकांनी याची दखल घेवून बसफेरी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी एस. टी बस थांब्यावर येवून थांबले. मात्र दुसऱ्या दिवशीही बस न आल्याने कंटाळून विद्यार्थी घरी गेले.

येडगेवाडी ते कुंभारखाणी माध्यमिक विद्यामंदिरमधील अंतर हे १९ किलोमीटर असल्याने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत चालत जाणे शक्य नाही. विद्यार्थ्यांना घरचा रस्ता धरण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता.

जूनमध्ये शाळा सुरु झाली, तेव्हा येडगेवाडी विद्यार्थ्यांसाठी एस. टी. महामंडळाने चिपळूण-पाचांबे येडगेवाडी ही बसफेरी नियमित सुरु केली होती. मात्र मध्येच ब्रेक देत ही फेरी बंद करुन देवरुख आगारातून सुटणारी मिडीबस येडगेवाडीपर्यंत विस्तारीत केली.

या मिडीबसची वेळ बदलून द्यावी, अशी वारंवार विनंती करण्यात आली. वेळ न बदलता सुरु ठेवलेल्या मिडीबसकडे ही एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. अखेर त्या मिडीबसला घरघर लागल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले.

चिपळूण आगारातून सकाळी ७.४५ वाजता सुटणारी चिपळूण - पाचांबे येडगेवाडी ही बस विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होती. मात्र ती बंद करुन त्याऐवजी देवरुख आगाराची मिडीबस सुरु करण्यात आली होती. ही मिडीबस येडगेवाडीत सकाळी ७.३० वाजता पोहचून परत हायस्कूलला ८.३० वाजता जात होती.

शाळेची वेळ १०.३० वाजताची असल्याने विद्यार्थ्यांना नाहक दोन तास शाळेतच बसून रहावे लागत आहे. त्यातच विद्यार्थी नियमीत सकाळी ६ वाजता उठून उपाशीपोटी घर सोडत असल्याने दुपारी १.३० जेवणाच्या सुट्टीत जेवण करावे लागते. अल्पोहार वैगेरे न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न पालक विचारु लागले आहेत.

टॅग्स :konkanकोकणstate transportराज्य परीवहन महामंडळ