शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

येडगेवाडी विद्यार्थ्यांची सलग दुसऱ्या दिवशीही शाळेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:29 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील विद्यार्थ्यांची सध्या एस. टी. अभावी गैरसोय होत असून दिवाळीची सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत निघाले खरे; मात्र पहिल्या दिवशी एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली होती. रत्नागिरी विभागीय नियंत्रकांनी याची दखल घेवून बसफेरी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देएस. टी. महामंडळाचा असहकार सुरुच विद्यार्थ्यांचे हाल, प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील विद्यार्थ्यांची सध्या एस. टी. अभावी गैरसोय होत असून दिवाळीची सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत निघाले खरे; मात्र पहिल्या दिवशी एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली होती. रत्नागिरी विभागीय नियंत्रकांनी याची दखल घेवून बसफेरी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी एस. टी बस थांब्यावर येवून थांबले. मात्र दुसऱ्या दिवशीही बस न आल्याने कंटाळून विद्यार्थी घरी गेले.

येडगेवाडी ते कुंभारखाणी माध्यमिक विद्यामंदिरमधील अंतर हे १९ किलोमीटर असल्याने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत चालत जाणे शक्य नाही. विद्यार्थ्यांना घरचा रस्ता धरण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता.

जूनमध्ये शाळा सुरु झाली, तेव्हा येडगेवाडी विद्यार्थ्यांसाठी एस. टी. महामंडळाने चिपळूण-पाचांबे येडगेवाडी ही बसफेरी नियमित सुरु केली होती. मात्र मध्येच ब्रेक देत ही फेरी बंद करुन देवरुख आगारातून सुटणारी मिडीबस येडगेवाडीपर्यंत विस्तारीत केली.

या मिडीबसची वेळ बदलून द्यावी, अशी वारंवार विनंती करण्यात आली. वेळ न बदलता सुरु ठेवलेल्या मिडीबसकडे ही एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. अखेर त्या मिडीबसला घरघर लागल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले.

चिपळूण आगारातून सकाळी ७.४५ वाजता सुटणारी चिपळूण - पाचांबे येडगेवाडी ही बस विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होती. मात्र ती बंद करुन त्याऐवजी देवरुख आगाराची मिडीबस सुरु करण्यात आली होती. ही मिडीबस येडगेवाडीत सकाळी ७.३० वाजता पोहचून परत हायस्कूलला ८.३० वाजता जात होती.

शाळेची वेळ १०.३० वाजताची असल्याने विद्यार्थ्यांना नाहक दोन तास शाळेतच बसून रहावे लागत आहे. त्यातच विद्यार्थी नियमीत सकाळी ६ वाजता उठून उपाशीपोटी घर सोडत असल्याने दुपारी १.३० जेवणाच्या सुट्टीत जेवण करावे लागते. अल्पोहार वैगेरे न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न पालक विचारु लागले आहेत.

टॅग्स :konkanकोकणstate transportराज्य परीवहन महामंडळ