शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

येडगेवाडी विद्यार्थ्यांची सलग दुसऱ्या दिवशीही शाळेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:29 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील विद्यार्थ्यांची सध्या एस. टी. अभावी गैरसोय होत असून दिवाळीची सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत निघाले खरे; मात्र पहिल्या दिवशी एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली होती. रत्नागिरी विभागीय नियंत्रकांनी याची दखल घेवून बसफेरी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देएस. टी. महामंडळाचा असहकार सुरुच विद्यार्थ्यांचे हाल, प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील विद्यार्थ्यांची सध्या एस. टी. अभावी गैरसोय होत असून दिवाळीची सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत निघाले खरे; मात्र पहिल्या दिवशी एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली होती. रत्नागिरी विभागीय नियंत्रकांनी याची दखल घेवून बसफेरी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी एस. टी बस थांब्यावर येवून थांबले. मात्र दुसऱ्या दिवशीही बस न आल्याने कंटाळून विद्यार्थी घरी गेले.

येडगेवाडी ते कुंभारखाणी माध्यमिक विद्यामंदिरमधील अंतर हे १९ किलोमीटर असल्याने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत चालत जाणे शक्य नाही. विद्यार्थ्यांना घरचा रस्ता धरण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता.

जूनमध्ये शाळा सुरु झाली, तेव्हा येडगेवाडी विद्यार्थ्यांसाठी एस. टी. महामंडळाने चिपळूण-पाचांबे येडगेवाडी ही बसफेरी नियमित सुरु केली होती. मात्र मध्येच ब्रेक देत ही फेरी बंद करुन देवरुख आगारातून सुटणारी मिडीबस येडगेवाडीपर्यंत विस्तारीत केली.

या मिडीबसची वेळ बदलून द्यावी, अशी वारंवार विनंती करण्यात आली. वेळ न बदलता सुरु ठेवलेल्या मिडीबसकडे ही एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. अखेर त्या मिडीबसला घरघर लागल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले.

चिपळूण आगारातून सकाळी ७.४५ वाजता सुटणारी चिपळूण - पाचांबे येडगेवाडी ही बस विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होती. मात्र ती बंद करुन त्याऐवजी देवरुख आगाराची मिडीबस सुरु करण्यात आली होती. ही मिडीबस येडगेवाडीत सकाळी ७.३० वाजता पोहचून परत हायस्कूलला ८.३० वाजता जात होती.

शाळेची वेळ १०.३० वाजताची असल्याने विद्यार्थ्यांना नाहक दोन तास शाळेतच बसून रहावे लागत आहे. त्यातच विद्यार्थी नियमीत सकाळी ६ वाजता उठून उपाशीपोटी घर सोडत असल्याने दुपारी १.३० जेवणाच्या सुट्टीत जेवण करावे लागते. अल्पोहार वैगेरे न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न पालक विचारु लागले आहेत.

टॅग्स :konkanकोकणstate transportराज्य परीवहन महामंडळ