शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचन योजना अनुदानात घट

By admin | Updated: October 2, 2016 23:26 IST

शेतकरी निराश : बागायती जगवण्यासाठी ‘ठिबक’चा अवलंब

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बागायती जगवण्यासाठी ठिबक तथा सूक्ष्म सिंचन योजनेचा अवलंब करीत आहेत. सुरुवातीला भरघोस अनुदान देण्यात येत होते. मात्र, या अनुदानात घट झाली असून, ते ३५ टक्क्यांवर आणले आहे. सूक्ष्म सिंचन योजना राबवण्यासाठी जेवढा खर्च केला जातो, त्या तुलनेत अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्याला अर्थार्जन् मिळवून देणारी आंबा व काजू महत्त्वाची दोन पिके आहेत. जिल्ह्यात ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. काजूची लागवड ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. रत्नागिरी जिल्हा डोंगरदऱ्यातून विभागलेला आहे. कातळावर, डोंगरावर कलम बागायती लागवड करण्यात आली आहे. कातळावरील विहिरींना पाणी मिळत नाही. एप्रिल, मेमध्ये पाण्याचा साठा कमी होत असल्याने कलम बागा जगवण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. त्यासाठी सूक्ष्म सिंचन योजना फायदेशीर ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सूक्ष्म सिंचन योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. गतवर्षी शासनाने सूक्ष्म सिंचन योजनेसाठी आॅनलाईन प्रस्तावाची मागणी केली होती. शेतकऱ्यांना आॅनलाईन सुविधेबाबत माहिती मिळेपर्यंत उशीर झाला. शिवाय १५ नोव्हेंबर रोजी शासनाची आॅनलाईन अर्ज करण्याची साईट सुरू करण्यात आली. त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. सन २०१३ - १४मध्ये ९१ शेतकऱ्यांनी ठिबक योजनेचा लाभ घेतला होता. त्या शेतकऱ्यांना १३ लाख ३७ हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले होते. २०१४ - १५मध्ये ६६ शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याने त्यांना ८ लाख ९१ हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले होते. गतवर्षी २०१५-१६मध्ये साईट सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून एकही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना २०१६ - १७साठी शासनाने आणली असून, ई - ठिबक आज्ञावलीमध्ये आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. दि. ६ आॅक्टोबरपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आॅनलाईन प्रणालीमुळे शासनाने खर्चाचे मापदंड निश्चित केले आहे. बागायतीमध्ये शेतकऱ्याची विहीर असणे आवश्यक आहे. विहिरीपासून कलम बागायतीमध्ये कमालीचे अंतर असते. त्यामुळे बागायतीपर्यंत बसवण्यात आलेल्या पाण्याच्या वाहिनीचा खर्च सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी ग्राह्य धरला जात नाही. साधारण एक हेक्टर क्षेत्रासाठी ठिबक योजना बसवण्यासाठी लाखभर रूपये खर्च येतो. सुरुवातीला सर्वसाधारण गटासाठी भरघोस अनुदान शासनाकडून देण्यात येत होते. मात्र, त्या अनुदानात आता घट केली आहे. सर्वसाधारण गटासाठी ३५ टक्के, तर अल्प-अत्यल्प गटासाठी ४५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानाच्या रकमेत खर्च निघत नसल्यामुळे नाराजीचा सूर आहे. बहुतांश शेतकरी साधारणत: बागायती लागवडीनंतर ३ ते ५ वर्षे पाणी देतात. त्यानंतर मात्र पावसाच्या पाण्यावरच कलमांची वाढ होते. अधिकत्तम शेतकरी कलम बागा कराराने देत असल्यामुळे बागायतीमध्ये ठिबक बसविण्यास इच्छुक नसतात. मात्र, जे शेतकरी कराराने बागा न देताच स्वत: उत्पन्न घेतात, ते मात्र ठिबक बसवतात. कलम बागायतींसाठी ठिबक तर अन्य शेतींसाठी तुषार सिंचन बसविले जाते. कडक ऊन्हातून आंबा, काजू कलमांना अधूनमधून पाणी दिल्यास चांगली फळे मिळतात. अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा, आठ अ, बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आवश्यक आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधित कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक आहे. उन्हाळी शेतीवर भर : तुषार सिंचन फायदेशीर जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारी आंबा व काजू महत्त्वाची पिके. रत्नागिरी जिल्हा डोंगरदऱ्यातून विभागलेला आहे. कातळावर, डोंगरावर कलम बागायती लागवड़ उन्हाळ्यात पाण्याची टंचाई. सध्या जिल्ह्यात उन्हाळी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. बंधारे बांधून पाणी अडवून भाजी, कलिंगडे, भात, भुईमूग, मका, सूर्यफूल तसेच वेलवर्गीय अन्य भाज्यांचे उत्पादन घेण्यात येत असल्यामुळे या शेतीतून चांगले उत्पन्न घेण्यासाठी तुषार सिंचन पध्दती फायदेशीर आहे.