शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ठिबक सिंचन योजना अनुदानात घट

By admin | Updated: October 2, 2016 23:26 IST

शेतकरी निराश : बागायती जगवण्यासाठी ‘ठिबक’चा अवलंब

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बागायती जगवण्यासाठी ठिबक तथा सूक्ष्म सिंचन योजनेचा अवलंब करीत आहेत. सुरुवातीला भरघोस अनुदान देण्यात येत होते. मात्र, या अनुदानात घट झाली असून, ते ३५ टक्क्यांवर आणले आहे. सूक्ष्म सिंचन योजना राबवण्यासाठी जेवढा खर्च केला जातो, त्या तुलनेत अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्याला अर्थार्जन् मिळवून देणारी आंबा व काजू महत्त्वाची दोन पिके आहेत. जिल्ह्यात ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. काजूची लागवड ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. रत्नागिरी जिल्हा डोंगरदऱ्यातून विभागलेला आहे. कातळावर, डोंगरावर कलम बागायती लागवड करण्यात आली आहे. कातळावरील विहिरींना पाणी मिळत नाही. एप्रिल, मेमध्ये पाण्याचा साठा कमी होत असल्याने कलम बागा जगवण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. त्यासाठी सूक्ष्म सिंचन योजना फायदेशीर ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सूक्ष्म सिंचन योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. गतवर्षी शासनाने सूक्ष्म सिंचन योजनेसाठी आॅनलाईन प्रस्तावाची मागणी केली होती. शेतकऱ्यांना आॅनलाईन सुविधेबाबत माहिती मिळेपर्यंत उशीर झाला. शिवाय १५ नोव्हेंबर रोजी शासनाची आॅनलाईन अर्ज करण्याची साईट सुरू करण्यात आली. त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. सन २०१३ - १४मध्ये ९१ शेतकऱ्यांनी ठिबक योजनेचा लाभ घेतला होता. त्या शेतकऱ्यांना १३ लाख ३७ हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले होते. २०१४ - १५मध्ये ६६ शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याने त्यांना ८ लाख ९१ हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले होते. गतवर्षी २०१५-१६मध्ये साईट सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून एकही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना २०१६ - १७साठी शासनाने आणली असून, ई - ठिबक आज्ञावलीमध्ये आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. दि. ६ आॅक्टोबरपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आॅनलाईन प्रणालीमुळे शासनाने खर्चाचे मापदंड निश्चित केले आहे. बागायतीमध्ये शेतकऱ्याची विहीर असणे आवश्यक आहे. विहिरीपासून कलम बागायतीमध्ये कमालीचे अंतर असते. त्यामुळे बागायतीपर्यंत बसवण्यात आलेल्या पाण्याच्या वाहिनीचा खर्च सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी ग्राह्य धरला जात नाही. साधारण एक हेक्टर क्षेत्रासाठी ठिबक योजना बसवण्यासाठी लाखभर रूपये खर्च येतो. सुरुवातीला सर्वसाधारण गटासाठी भरघोस अनुदान शासनाकडून देण्यात येत होते. मात्र, त्या अनुदानात आता घट केली आहे. सर्वसाधारण गटासाठी ३५ टक्के, तर अल्प-अत्यल्प गटासाठी ४५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानाच्या रकमेत खर्च निघत नसल्यामुळे नाराजीचा सूर आहे. बहुतांश शेतकरी साधारणत: बागायती लागवडीनंतर ३ ते ५ वर्षे पाणी देतात. त्यानंतर मात्र पावसाच्या पाण्यावरच कलमांची वाढ होते. अधिकत्तम शेतकरी कलम बागा कराराने देत असल्यामुळे बागायतीमध्ये ठिबक बसविण्यास इच्छुक नसतात. मात्र, जे शेतकरी कराराने बागा न देताच स्वत: उत्पन्न घेतात, ते मात्र ठिबक बसवतात. कलम बागायतींसाठी ठिबक तर अन्य शेतींसाठी तुषार सिंचन बसविले जाते. कडक ऊन्हातून आंबा, काजू कलमांना अधूनमधून पाणी दिल्यास चांगली फळे मिळतात. अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा, आठ अ, बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आवश्यक आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधित कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक आहे. उन्हाळी शेतीवर भर : तुषार सिंचन फायदेशीर जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारी आंबा व काजू महत्त्वाची पिके. रत्नागिरी जिल्हा डोंगरदऱ्यातून विभागलेला आहे. कातळावर, डोंगरावर कलम बागायती लागवड़ उन्हाळ्यात पाण्याची टंचाई. सध्या जिल्ह्यात उन्हाळी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. बंधारे बांधून पाणी अडवून भाजी, कलिंगडे, भात, भुईमूग, मका, सूर्यफूल तसेच वेलवर्गीय अन्य भाज्यांचे उत्पादन घेण्यात येत असल्यामुळे या शेतीतून चांगले उत्पन्न घेण्यासाठी तुषार सिंचन पध्दती फायदेशीर आहे.