शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी संख्येत यावर्षी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षा ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी कोकण विभागीय मंडळामार्फत तयारी सुरू आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

कोरोनामुळे निम्मे शैक्षणिक सत्र ऑनलाइन संपले. नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. अभ्यासाच्या ताणामुळे काही विद्यार्थ्यांनी गॅप घेतला असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. बोर्डाची परीक्षा असल्याने गुणवत्तेवर परिणाम होण्याच्या भीतीमुळे यावर्षी परीक्षा न देता पुढच्या वर्षी परीक्षा देण्याचा निर्णय काही विद्यार्थ्यांनी घेतला आहे. पालकांनीदेखील मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला आहे.

गतवर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २३ हजार ७३६ विद्यार्थी बसले होते. मात्र, यावर्षी २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी ४०९ असून, दिव्यांग २०४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ हजार ३५८ विद्यार्थी कमी आहेत. बारावीसाठी गतवर्षी २०,१४८ विद्यार्थी होते, यावर्षी १७ हजार ६७६ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज सादर केले आहेत. दिव्यांग २९ व पुनर्परीक्षार्थी ४०९ आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २४७२ विद्यार्थी कमी आहेत. तुलनात्मकदृष्ट्या हा फरक प्रचंड आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा बोर्डाच्या असल्याने शैक्षणिक टप्प्यातील महत्त्वपूर्ण परीक्षा आहेत. गणित, विज्ञानसारख्या काठिण्यपातळीवर विषयाबाबत मुलांमध्ये आधीच भीती आहे. निम्मे सत्र ऑनलाइन होते. त्यामुळे शिकवण्यास वेळेची मर्यादा होती. आकलन झाले अथवा नाही हे कळणे अवघड होते. कोरोनामुळे अभ्यासाचा खेळखंडोबा झाल्याने परीक्षार्थींच्या संख्येत घट झाली आहे.