शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राजापूर काजिर्डामार्गे कोल्हापूर घाटरस्त्याचा आराखडा तयार, १ कोटी रुपये मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:36 IST

सर्वेक्षणासाठी कंपनीला ठेका

राजापूर : कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा आणखी एक घाटमार्ग राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या घाटरस्त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. परराज्यातील एका कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आल्याची माहिती संबंधित बांधकाम विभागाकडून मिळाली आहे.जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत काही घाटांत दरडी कोसळून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राशी दळणवळणाचा संपर्क काही दिवस बंद पडला होता. त्यानंतर काजिर्डा घाटाचा मुद्दा प्रकाशात आला होता. यापूर्वी सने १९७४-७८ मध्ये रोजगार हमी योजनेतून काजिर्डा-कोल्हापूर जोडणाऱ्या घाटाच्या खोदकामाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, अणुस्कुरा घाटाच्या कामानंतर काजिर्डा मार्गे घाटरस्त्याचे काम मागे पडले हाेते.काजिर्डा घाट मार्ग हाेण्यासाठी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शासन दरबारी प्रयत्न सुरू केले हाेते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात काजिर्डा घाटाच्या सर्वेक्षणासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करून रस्ता सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली. त्यानुसार परराज्यातील एका कंपनीला ते काम मिळाले आहे.काजिर्डा-कोल्हापूर हे अंतर सुमारे ५० ते ५५ किलाेमीटरचे असून, अन्य घाट मार्गाच्या तुलनेत सुमारे ३० ते ३५ किलाेमीटर अंतर वाचू शकणार आहे. पडसाळी (कोल्हापूर) ते बाजार भोगाव अंतर सुमारे २० किलाेमीटर तर बाजार भोगाव ते कोल्हापूर अंतर ३० ते ३५ किलाेमीटर आहे.

  • काजिर्डा घाट चार ते साडेचार किलाेमीटरचा असला तरी सुरक्षित केला जाणारा रस्ता लक्षात घेता जवळपास आठ ते दहा किलाेमीटरची घाटाची व्याप्ती होऊ शकते.
  • या घाटामुळे आजूबाजूच्या ५५ ते ६० गावांना कोल्हापूरसाठी फायदा होणार आहे .
  • कोल्हापूर, कळे, बाजार भोगाव काळजवडे, पडसाळी, काजिर्डा, मूर, तळवडे, पाचल, रायपाटण, ओणी, राजापूर असा त्या घाटरस्त्याचा मार्ग असेल. पन्हाळा तालुक्यातील शेवटचे गाव पडसाळी आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूर