शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

रत्नागिरी जिल्ह्याच्या लाॅकडाऊनबाबतचा निर्णय आणखी दोन दिवस लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:31 IST

रत्नागिरी : सध्या १५ मे पर्यंत लाॅकडाऊन आहे. तो पुढे किती दिवसांपर्यंत वाढवायचा, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील; ...

रत्नागिरी : सध्या १५ मे पर्यंत लाॅकडाऊन आहे. तो पुढे किती दिवसांपर्यंत वाढवायचा, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील; पण त्याचबरोबर जिल्ह्यात कोविडची परिस्थिती काय आहे, हे बघून निर्णय घेण्याचे अधिकार त्या-त्या जिल्ह्याला दिलेले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा झाली आहे. काही विषयासंदर्भात आढावा घेऊन काही निर्बंध अधिक कडक करायचे किंवा त्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा, हे येत्या दोन-तीन दिवसांत ठरवून त्यानुसार तो निर्णय जाहीर करू, असे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन होणार की नाही, हा निर्णय आणखी काही दिवस पुढे गेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड साथीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरण, तसेच आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य आस्थापना, तसेच ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ आदी सर्व विषयांसंंदर्भात आढावा बैठका घेण्यासाठी पालकमंत्री ॲड. अनिल परब गुरुवारी रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बबिता कमलापूरकर, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

दोनच दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी रत्नागिरीत लाॅकडाऊन करायचे किंवा नाही, याचा निर्णय गुरुवारी पालकमंत्री घेतील, असे सांगितले होते. तसेच वेळ पडल्यास कडक लाॅकडाऊन करण्यात येईल, असेही सूतोवाच केले होते. त्यामुळेे पालकमंत्री गुरुवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा करणार, असे वाटत होते. मात्र, ॲड. परब यांनी हा निर्णय आणखी दोन-तीन दिवसांनंतर घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत १५ मेपर्यंत सध्या लाॅकडाऊन सुरू आहे हे लाॅकडाऊन पुढे किती दिवसांपर्यंत वाढवायचे, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात असलेली कोरोनाची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी कोणते निर्बंध लावायचे, कोणते अधिक कडक करायचे याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यायचा आहे. त्यादृष्टीने सविस्तर चर्चा केल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले. त्यामुळे लाॅकडाऊनचा निर्णय पुन्हा जिल्हाधिकारी मिश्रा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.