शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चालकांच्या ठेकेदाराला ठरलेेली रक्कम न देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:31 AM

रत्नागिरी : जोपर्यंत वाहनचालकांची पूर्ण रक्कम ठेकेदाराकडून दिली जात नाही, तोपर्यंत ठरलेली रक्कम त्या ठेकेदाराला देण्यात येणार नाही, ...

रत्नागिरी : जोपर्यंत वाहनचालकांची पूर्ण रक्कम ठेकेदाराकडून दिली जात नाही, तोपर्यंत ठरलेली रक्कम त्या ठेकेदाराला देण्यात येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.

ही सभा अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व अधिकारी, सभापती उपस्थित होते. केारोनाच्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नियोजनाचे केंद्र सरकारसह सुप्रिम कोर्टानेही कौतुक केले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.

कंत्राटी वाहनचालकांच्या मानधनाबाबत या सभेत चर्चा झाली. जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेल्या चालकांच्या मानधनात मागील महिन्यापासून वाढ करण्यात आली आहे. त्यांना १३,५०० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याप्रमाणे मानधन देण्यात येत आहे. एप्रिल महिन्याच्या वाढीव मानधनानुसार ठेकेदाराकडून अजूनही ७४२ रुपये चालकांना मिळालेले नाहीत. ही रक्कम पूर्ण करावी. त्यानंतर ठेकेदाराला त्याची ठरलेली रक्कम देण्यात येईल, असा निर्णय या सभेत घेण्यात आला.