शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गाची स्वप्नपूर्ती लांबणीवर; चिपळुणातील उड्डाणपूल पूर्ण करण्यास डिसेंबर २०२५ ची कालमर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 19:05 IST

पिलरवर गर्डर टाकल्यानंतर त्यावर काँक्रिटचा स्लॅब टाकून उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार

चिपळूण : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडेलल्या चिपळुणातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. दोन रिग मशीनद्वारे पिलर उभारण्यासाठी उत्खनन केले जात असून, पुन्हा एकदा या कामाला वेग आला आहे. सध्या उभारण्यात आलेल्या पिलरच्या मधे आणखी एक पिलर उभा करण्याचे नवे डिझाईन मंजूर झाले असून, या कामासाठी डिसेंबर २०२५ पर्यंतची कालमर्यादा देण्यात आली आहे. त्यामुळे महामार्ग पूर्ण होण्यासाठी आता आणखी दीड वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली परंतु तोही कालावधी आता कमी पडू लागला आहे. चिपळूणच्या सर्वाधिक १८०० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम बराच काळ रखडले आहे. या पुलाच्या कामाला डिसेंबर २०२३ पर्यंत अंतिम मुदत होती. परंतु ऑक्टोबर २०२३ मध्ये काम सुरू असतानाच पुलाचा काही भाग कोसळला. शहरातील बहादूर शेखनाका येथे ही घटना घडली होती. त्यानंतर पुलाचे काम थांबविण्यात आले होते.उड्डाणपुलाच्या पहिल्या डिझाईननुसार ४० मीटरवर पिलर उभारण्यात आले होते. पिलरचे काम अंतिम टप्प्यात होते तसेच त्यासाठी लागणारे गर्डर ही पूर्णतः तयार झाले होते. अशातच दुर्घटना घडली आणि या उड्डाणपुलाचे काम थांबले. मात्र, बहादूरशेखनाका येथे वळणावरून हा पूल जात असल्याने डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. नव्या डिझाईनला तब्बल सहा सात महिन्यांनंतर मंजुरी मिळाली. नव्या डिझाईननुसार दोन पिलरमधील गाळ्याचे अंतर २० मीटर राहणार आहे. प्रत्येक २० मीटरवर एक पिलर उभारण्यात येणार  आहे.  काही दिवसांपूर्वीच या उड्डाणपुलासाठी नव्याने पिलर उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अतिथी हॉटेलच्या समोर खोदाईला सुरुवातही झाली. दोन रिग मशीन आणून उत्खनन सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढ्या खोदाईवर भर दिला जाणार आहे. उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेले गर्डर पुन्हा नव्याने केले जाणार असून त्यासाठी कळंबस्ते येथे प्लँट उभारण्यात आला आहे. पिलरवर गर्डर टाकल्यानंतर त्यावर काँक्रिटचा स्लॅब टाकून उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. पहिल्या डिझाईननुसार दोन पिलरमधील अंतर ४० मीटर होते. मात्र, आता २० मीटरवर पिलर उभारले जात असल्याने गर्डरचेही त्याच पद्धतीने काम केले जाणार आहे.

उड्डाणपुलाचे काम ईगल कंपनीच करत आहे. केवळ ठेकेदार बदलला आहे. नव्या डिझाईनप्रमाणे काम सुरू झाले असून कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. उड्डाणपुल कोसळल्यानंतर तयार केलेले पहिले गर्डर आणि पॅन नष्ट करावे लागल्याने ठेकेदाराचेही मोठे नुकसान झाले. आता शासनाकडून उड्डाणपुलासाठी नव्याने वाढीव खर्च  केला जाणार आहे. - आर. पी. कुलकर्णी,  जिल्हा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणhighwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवा