शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अस्तान कातकरीवाडी येथे शाळकरी मुलींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 20:19 IST

खेड तालुक्यातील अस्तान कातकरीवाडी येथे दोन शाळकरी मुली बुधवार २५ रोजी सायंकाळी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. दोघींनी मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी गोळ्या प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ठळक मुद्देअस्तान कातकरीवाडी येथे शाळकरी मुलींचा मृत्यूदोघींच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात गुंतली पोलिस यंत्रणा

खेड : तालुक्यातील अस्तान कातकरीवाडी येथे दोन शाळकरी मुली बुधवार २५ रोजी सायंकाळी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. दोघींनी मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी गोळ्या प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.तालुक्यातील अस्तान कातकरीवाडीत राहणाऱ्या भारती हिलम (१५) व साक्षी निकम (१३) या दहावी व नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींचा बुधवारी मृत्यू झाला. भारती हिलम ही साक्षी निकम हिच्याकडे पाहुणी म्हणून आली होती. तिचे वडील किसन हिलम हे शिक्षक- पालक संघाच्या बैठकीसाठी आंबवली हायस्कूलमध्ये गेले होते.

बैठकीनंतर ते घरी गेले असता त्यांना दोन्ही मुली घरातच पडलेल्या आढळल्या. दोघींना तातडीने आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.दोघीचे शव विच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या दोघींच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात पोलिस यंत्रणा गुंतली आहे याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद सायंकाळी उशिरा करण्यात आली.

टॅग्स :Deathमृत्यूRatnagiriरत्नागिरी