शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अस्तान कातकरीवाडी येथे शाळकरी मुलींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 20:19 IST

खेड तालुक्यातील अस्तान कातकरीवाडी येथे दोन शाळकरी मुली बुधवार २५ रोजी सायंकाळी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. दोघींनी मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी गोळ्या प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ठळक मुद्देअस्तान कातकरीवाडी येथे शाळकरी मुलींचा मृत्यूदोघींच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात गुंतली पोलिस यंत्रणा

खेड : तालुक्यातील अस्तान कातकरीवाडी येथे दोन शाळकरी मुली बुधवार २५ रोजी सायंकाळी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. दोघींनी मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी गोळ्या प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.तालुक्यातील अस्तान कातकरीवाडीत राहणाऱ्या भारती हिलम (१५) व साक्षी निकम (१३) या दहावी व नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींचा बुधवारी मृत्यू झाला. भारती हिलम ही साक्षी निकम हिच्याकडे पाहुणी म्हणून आली होती. तिचे वडील किसन हिलम हे शिक्षक- पालक संघाच्या बैठकीसाठी आंबवली हायस्कूलमध्ये गेले होते.

बैठकीनंतर ते घरी गेले असता त्यांना दोन्ही मुली घरातच पडलेल्या आढळल्या. दोघींना तातडीने आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.दोघीचे शव विच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या दोघींच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात पोलिस यंत्रणा गुंतली आहे याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद सायंकाळी उशिरा करण्यात आली.

टॅग्स :Deathमृत्यूRatnagiriरत्नागिरी