शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दापोलीत केवळ २४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा : किरीट सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 19:06 IST

CoronaVirus Dapoli Ratnagiri : राज्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असून राज्याचे आरोग्यमंत्री मात्र जालना व पुणे या भागाकडेच जास्त लक्ष देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. वस्तुस्थिती पाहून हे मंत्री बोलत नाहीत. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय त्यांना झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोली येथे बोलताना केला.

ठळक मुद्देदापोलीत केवळ २४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा : किरीट सोमय्यासोमय्या यांनी केली दापोली कोविड सेंटरची पाहणी

दापोली : राज्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असून राज्याचे आरोग्यमंत्री मात्र जालना व पुणे या भागाकडेच जास्त लक्ष देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. वस्तुस्थिती पाहून हे मंत्री बोलत नाहीत. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय त्यांना झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोली येथे बोलताना केला.दापोली उपजिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटरची पाहणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरूवारी केली. यावेळी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांनी सोमय्या यांना कोविड सेंटरची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, कोरोनाला अंकुश लावण्यात राज्यसरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री केवळ केंद्रसरकारकडे बोट दाखवत आहेत. मात्र राज्याने ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या मात्र केल्या जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला.कोरोनाच्या लसीबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, जगामध्ये केवळ ७ कंपन्यांना कोविडवरची लस उत्पादन करण्याची परवानगी असून, त्यातील २ कंपन्या या भारतामध्ये आहेत. या कंपन्या किती उत्पादन करू शकतात याची पूर्ण कल्पना ही राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना आहे. मात्र, आपल्या अपयशाचे खापर केंद्रावर फोडायचे म्हणून केंद्र सरकार लस पुरवत नाही असा खोटा प्रचार केला जात आहे. वस्तूस्थितीत मात्र केंद्राकडून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा हा महाराष्ट्राला केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी