शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला- शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 11:31 IST

Uday Samant, mumbi univercity, ratnagirinews, educationsector, मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेच्या ऑनलाईन परीक्षेत काहीच गोंधळ झालेला नाही. विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे हा सर्व्हर डाऊन झाला. याबाबत मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली असून, याप्रकरणाची चौकशी होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्दे विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला- शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहितीमुंबई पोलीस सहआयुक्तांकडे तक्रार

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेच्या ऑनलाईन परीक्षेत काहीच गोंधळ झालेला नाही. विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे हा सर्व्हर डाऊन झाला. याबाबत मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली असून, याप्रकरणाची चौकशी होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.ते म्हणाले, आॅनलाईन शिक्षणाचा काहीच घोळ नाही. घोळ घालणारेच हा घोळ घालतात. मंगळवारी झालेली परीक्षा ही बाहेरून परीक्षेला बसू इच्छिणाऱ्यांसाठी होती. मात्र, यासाठी कार्यरत असलेल्या सर्व्हरवरच सायबर अ‍ॅटॅक झाला. त्यामुळे ९ हजार विद्यार्थी परीक्षा देत असतानाच एकदम अडीच लाख विद्यार्थी ही लिंक ओपन करताना दिसले. यंत्रणा ठप्प होण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सामंत यांनी सांगितले. हा सायबर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ग्रंथालये सुरू होणारलॉकडाऊनमुळे वाचनालये बंद आहेत. अनेक जणांना वाचनालये, ग्रंथालये सुरू होण्याची प्रतीक्षा असून, त्यासाठी मागणी होत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत वाचनालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.खडसेंनी उद्धव ठाकरेंसोबत काम करावेनाराज एकनाथ खडसे यांनी कुठे जावे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत आपण काही बोलू शकत नाही. ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ यावी, हे दुर्दैवी आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावे, असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीMumbai Universityमुंबई विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र