शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापूरच्या गंगातीर्थ क्षेत्री भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 18:33 IST

राजापूर : कडक उन्हामुळे नैसर्गिक जलस्राेत आटलेले असतानाच राजापूर शहरानजीकच्या गंगातीर्थ क्षेत्री गंगेचे आगमन झाले आहे. ऐन उन्हाळ्यातच गंगेचे ...

राजापूर : कडक उन्हामुळे नैसर्गिक जलस्राेत आटलेले असतानाच राजापूर शहरानजीकच्या गंगातीर्थ क्षेत्री गंगेचे आगमन झाले आहे. ऐन उन्हाळ्यातच गंगेचे आगमन झाल्याने भाविकांची पावले गंगातीर्थ क्षेत्री वळली आहेत. सध्या शिमगोत्सवानिमित्त मुंबईकर गावी आले आहेत. त्यामुळे सुटीसाठी गावी आलेले मुंबईकर गंगातीर्थाला भेट देत असल्याने गर्दी वाढली आहे.

सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी गंगा प्रकट होते व जवळपास तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते असा प्रघात आहे. मात्र, अलीकडच्या कालावधीत तिच्या आगमन व निर्गमनच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे तर ती सलग आली होती. काही वर्षांपूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खूप लांबला होता. सातत्याने गंगामाई प्रकट होत असल्याने पूर्वीचा भाविकांचा ओढा कमी झाला आहे.

तीन वर्षांपूर्वी दि. ३० एप्रिल २०२१ रोजी गंगामाईचे आगमन झाल्यानंतर मार्च २०२२ पासून गंगामाईचा प्रवाह काहीसा कमी झाला होता. गायमुखातून वाहणारे पाणी बंद झाले होते. मात्र, गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने भरलेली हाेती. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर १५ मे २०२२ पासून पुन्हा गंगामाईचा प्रवाह वाढला व गायमुखही प्रवाहित झाले होते. तेव्हापासून गंगामाईचा प्रवाह अखंडितपणे सुरू होता. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये पुन्हा गायमुखातून वाहणारा प्रवाह बंद झाला होता.त्यानंतर आता रविवार, दि. २४ मार्च रोजी पुन्हा गायमुख प्रवाहित झाले असून, मूळ गंगेसह सर्व कुंड पाण्याने भरलेली आहेत. सध्या तालुक्यात शिमगोत्सवाची धामधूम सुरू असून, मोठ्या संख्येने मुंबईकर दाखल झाले आहेत. अशावेळी गंगामाईचे आगमन झाल्याने गंगाक्षेत्री भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुर