शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

 गुहागर तालुक्यातील व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:19 IST

गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्या बगाडा सोहळ्यासाठी जिल्हाभरातून भक्तांनी गर्दी केली होती. श्री व्याघ्रांबरी देवीचा उत्सव कार्तिक कृ. दर्श अमावास्येला असतो. दरवर्षी देवीचे नवस फेडण्यासाठी भक्त अंगाला आकडे टोचून घेत लाटेवर फिरतात.

ठळक मुद्दे गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध  उत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दीनरवण येथील ग्रामदैवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव चढता लाटेवर मानकरी, भाविकही झाले थक्कलाटेवर फिरताना देवीचा जयजयकार

असगोली (ता. गुहागर) : गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्यां बगाडा सोहळ्यासाठी जिल्हाभरातून भक्तांनी गर्दी केली होती. श्री व्याघ्रांबरी देवीचा उत्सव कार्तिक कृ. दर्श अमावास्येला असतो. दरवर्षी देवीचे नवस फेडण्यासाठी भक्त अंगाला आकडे टोचून घेत लाटेवर फिरतात. सायंकाळी आकडे टोचणे व लाट फिरवण्याचा कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात पार पडला.

गुहागर तालुक्यातील हा बगाडा उत्सव म्हणजे भक्तांची जणू परीक्षाच म्हणावी लागेल. स्वत:चा संपूर्ण देह हा देवीच्या श्रध्देपोटी दोन लोखंडी हुकांवर काही काळ लाटेवर टांगता ठेवणे आणि आपला नवस पूर्ण करणे असे या उत्सवाचे स्वरुप आहे.

भाविकांसाठी हा अपार श्रध्देचा विषय ठरतो. मंदिराच्या प्रांगणात सुमारे तीस फूट उंचीच्या खांबावर तेवढ्याच लांबीची सागवानी लाट फिरवली जाते. ज्या भक्तांचे नवस फेडायचे आहेत, ते स्वत: किंवा देवीचे मानकरी यांच्यामार्फत तो पूर्ण करतात.

यावेळी मानकरींच्या पाठीमागे धातूचे हूक टोचून उंचावरुन फेऱ्या मारणारे मानकरी व नवस फेडणारे भाविक अधांतरी फेऱ्या मारतात तसेच घंटा वाजवत देवीचा नामघोष करत फेऱ्या मारतात.

नवस फेडणाऱ्या भक्तांच्या पाठीला हा आकडा टोचला जातो. आकडा टोचल्यानंतर त्या भागातून कोणत्याही प्रकारे रक्त येत नाही किंवा भक्ताला कोणतीही इजादेखील होत नाही, हे नरवण येथील बगाडा उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. नवस फेडणारे भाविक हे लाटेवरुन पाच फेऱ्या पूर्ण करुन आपला नवस फेडतात.लाटेवर फिरताना देवीचा जयजयकारभक्ताला लाटेवर चढवले जाते. त्याच्या हातामध्ये देवीची मोठी घंटा दिली जाते आणि हा भक्त लाटेवर फिरताना देवीचा जयजयकार करीत असतो. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला असणारे ग्रामस्थ ही लाट प्रांगणात गोलगोल फिरवण्याचे काम करीत असतात. पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर भक्ताला लाटेवरुन खाली घेतले जाते व देवीला नमस्कार केला जातो. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTempleमंदिर