शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: पावसाअभावी पिके सलाईनवर, शेतकऱ्यांचे स्वप्न करपणार

By मेहरून नाकाडे | Updated: September 2, 2023 18:37 IST

ढगाळ हवामानामुळे कीडरोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता

रत्नागिरी : पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी जिल्ह्यातील पिके सध्या सलाईनवर असून पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे स्वप्न करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला असला तरी अन्यत्र मात्र शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. वरकस व कातळावरील भात पिके पाण्याअभावी पिवळी पडली आहेत.यावर्षी एकूणच पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्याचे मुख्य पिक भात असून ६८ हजार ८८.३७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उदिद्ष्ट असताना ६१ हजार २४९.१३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली आहे. नाचणी लागवड १० हजार ३९८ .२१ हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित असताना प्रत्यक्ष लागवड ९३७९.६८ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. तृणधान्य, तूर, मूग, उडीद व अन्य कडधान्य पिकाखालील लागवडही पावसाअभावी कमी झाली आहे. जिल्ह्यात ७९ हजार ८७१ .६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उद्दिष्ट असताना ७१ हजार ११.०९ लागवड करण्यात आली आहे. पावसाअभावी पेरण्या लांबल्या शिवाय पावसावर ८२ टक्के लागवडीची कामे पूर्ण झाली. परंतु नंतर पाऊस गायब झाल्याने प्रत्यक्ष लागवड कमी झाली आहे.गेले काही दिवस कडकडीत उन पडत असल्याने भात खाचरे कोरडी पडली आहेत. नदीकाठच्या खाचरातीलही ओलावा नष्ट झाला आहे. मात्र वरकस व कातळावरील लागवडीला चांगलाच फटका बसला आहे. पावसाअभावी उन्हामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होऊन जमिनीला भेगा पडल्या आहेत. रोपे पिवळी पडली आहेत. पिकांसाठी पाऊस गरजेचा आहे. काही भागात हळवे भात प्रसवले आहे. तर काही भागात फुलोरा स्वरूपात आहे.पावसाअभावी फुलोरा वाळण्याचा धोका आहे. शिवाय ढगाळ हवामानामुळे कीडरोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कडकडीत उन्हामुळे काही ठिकाणी करपा रोग पडला आहे. काही ठिकाणी पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे, तपकिरी तुडतुड्यांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.

काही तालुक्यात भात, नाचणी पिकावर करपा रोग पडला आहे. सध्या पिकांसाठी पाऊस गरजेचा आहे. पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांनी जमेल तसे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पिकांचे वेळोवेळी निरीक्षण करून कीडरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसFarmerशेतकरी