शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

धनगरवाड्यांचे महसुली गाव तयार करा : गोपीचंद्र पडळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:36 IST

Gopichand Padalkar Ratnagiri Bjp news-धनगरवाड्यांचे महसुली गाव तयार करून त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास धनगर समाजाचा विकास होईल, याकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी केले.

ठळक मुद्देधनगरवाड्यांचे महसुली गाव तयार करा : गोपीचंद्र पडळकरआमदार पडळकर कोकणच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

रत्नागिरी : धनगरवाड्यांचे महसुली गाव तयार करून त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास धनगर समाजाचा विकास होईल, याकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी केले.आमदार पडळकर हे कोकणच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्ह्यातील धनगरवाड्यांना भेटी दिल्यानंतर त्यांचे विदारक चित्र पाहून तीव्र नाराजी व्यक्त केल. धनगरवाड्यांकडे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत शासनाने दुर्लक्ष केल्याने हा धनगर समाज रस्ते, पाणी, शिक्षण, वीज, आरोग्य व अन्य भौतिक सुविधांपासून वंचित राहिल्याचा आरोपही पडळकर यांनी यावेळी केला.ते म्हणाले पुढे म्हणाले, धनगरवाड्यात या ग्रामपंचायतींना जोडले आहे. त्या धनगरवाड्यात एकत्रित करून त्यांचा महसुली गाव तयार करावा. त्यानंतर त्या गावामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करावी, जेणेकरून त्याच गावचा सरपंच असेल. तसेच राज्य आणि केंद्र सरकारकडून जिल्हा परिषद, पंचायत समितीपेक्षा जास्त निधी येतो, तो निधी त्याच गावांच्या विकासासाठी खर्च करता येईल. त्यामुळे धनगरवाड्यांचाही विकास होईल, अशी संकल्पना त्यांनी मांडली. छोटेछोटे धनगरवाडे ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आल्याने त्यांचे महत्व राहत नसल्याने त्यांचा विकास होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.राजकारणाच्या पलीकडे जाऊन धनगर समाजाचे प्रश्न समाजावून घेऊन ते निकाली काढण्याची गरज आहे. केवळ विकासाच्या गप्पा मारणे ही बाब लाजिरवाणी आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. लोकांनी या वाड्यांकडे राजकारणापुरते तसेच निवडणुकीपुरते जाऊन नंतर त्याकडे दुर्लक्ष करणे, हे योग्य नाही. त्यांच्याकडे माणुसकीने पाहावे.

राज्य शासनाने धनगरवाड्यांच्या विकासासाठी एखादा कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजेत. त्याला कुठल्याही राजकीय नेत्याची शिफारस असता कामा नये. त्यासाठी सर्वच धनगरवाड्यांचा सर्व्हेक्षण करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जिल्हा नियोजन मंडळाकडून धनगरवाड्यांमध्ये विकासकामांवर खर्च करायला पाहिजे. मात्र, जिल्हा नियोजनामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी भाजपचे उमेश कुलकर्णी, राजीव कीर, राजन बोडेकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.शासनाने मंडळ तयार करावेधनगरवाडे, आदिवासीपाडे यांच्यासाठी राज्य शासनाने एक मंडळ तयार करावे. या मंडळाच्या माध्यमातून या धनगरवाड्यांचा विकास करावा, अशी मागणी येत्या अधिवेशनामध्ये करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षणRatnagiriरत्नागिरीBJPभाजपा