शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची भीती वाटते - अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 19:13 IST

१० वर्षात जर अशी धरणं फुटायला लागली तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील. त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवून खेकडे कसे धरण फोडतात हे दाखवून देईल, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे चिपळुणात युतीला चिमटा

 

चिपळूण : चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची खूप भीती वाटते, असे सांगत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टिका केली. तिवरे धरण फुटले व २३ जण मृत्यूमुखी पडले, अनेक घरे उद्ध्वस्त झाली. आया-बहिणींचे कुंकू पुसले गेले, कच्ची-बच्ची अनाथ झाली आणि सत्तेत असलेले मंत्री खेकड्यांनी धरण फोडले, असे बेजबाबदार विधान करतात. १० वर्षात जर अशी धरणं फुटायला लागली तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील. त्यांना येत्याविधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवून खेकडे कसे धरण फोडतात हे दाखवून देईल, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील चौपाटीवरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवस्वराज्य यात्रेद्वारे शुक्रवारीशक्तीप्रदर्शन केले. यावेळी आयोजित सभेला जनसमुदाय उपस्थित होता.गुहागरहून शिवस्वराज्य यात्रा उक्ताड येथे आल्यानंतर तिचे स्वागत करण्यातआले. तेथून दुचाकी रॅली काढण्यात आली.डॉ. कोल्हे म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात असलेले सरकार शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा सर्वात जास्त वापर जर कोणी केला असेल तर या सरकारने केला आहे. सत्तेत असूनसुद्धाअरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी ते काहीच करू शकले  नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेला शिवाजी महाराजांचे नाव दिले आणि फसवी कर्जमाफी केली. शिवाजी महाराजांनी उभारलेले गड, किल्ले हे भाड्यानेदेण्याचा निर्णय घेतात, ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले.कोल्हे पुढे म्हणाले की, सत्तेत समान भागीदार असलेली शिवसेना गत पाच वर्षात काहीच करू शकलेली नाही. शेतकऱ्यांसाठी शिवराय हे शेवटपर्यंत लढले; पण सेना-भाजपच्या राज्यात १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात हा महाराजांचा अपमान नव्हे काय? असा सवाल करत खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवसेना व भाजपवर जोरदार टीका केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस