शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

घनकचऱ्याचा ‘सैराट’ कारभार!

By admin | Updated: May 14, 2016 00:04 IST

प्रकल्पाचे तीनतेरा : निधी मिळूनही १५ वर्षे जागेचा शोध सुरूच...

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीरत्नागिरी शहराच्या पाणीप्रश्नाइतकाच शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात दररोज २२ ते २४ टन कचरा संकलित होत असताना वर्षोनुवर्षे कचऱ्याचे ढीग जमा झाले तरी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षात पालिकेतील कारभाऱ्यांना उभारता आला नाही. प्रकल्प उभारणीबाबतचा हा कारभार ‘सैराट’ नव्हे तर दुसरे काय, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. रत्नागिरी हे जिल्ह्याची राजधानी असलेले शहर आहे. लोकसंख्याही प्रत्यक्षात ७७ हजार आहे. शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज २२ ते २४ टन कचरा जमा होत आहे. कचरा संकलनाची पालिकेची व्यवस्था काही त्रुटी सोडल्या तर चांगली आहे. कचरा संकलनासाठी घंटा गाड्या आहेत. दहापेक्षा अधिक कचरावाहक वाहने पालिकेकडे आहेत. सफाई कामगारांची संख्या मोठी आहे. पालिकेचे व कंत्राटी असे सफाई कामगार शहर सफाई कामात व्यस्त असतात. परंतु, जमा होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंधरा वर्षांपूर्वी शहराच्या मिऱ्या हद्दीवजळ कचरा टाकला जात होता. तेथे कचऱ्याचे ढीग जमा झाल्यानंतर कचरा कुजून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. नागरिकांचा तेथे कचरा टाकण्यास विरोध झाल्याने साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील मोठ्या जागेत शहरातील संकलित कचरा टाकणे सुरू झाले. एवढी मोठी जागा असूनही तेथे पंधरा वर्षात कचऱ्याचे मैदानच तयार झाले. जाळून कचरा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, कचरा काही संपला नाही. मात्र, धुराच्या लोटांमुळे साळवी स्टॉप येथील नागरिकांचा येथे कचरा टाकण्यास तीव्र विरोध सुरू झाला. त्यामुळे चार महिन्यांपूर्वीच साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात कचरा टाकणे पालिकेला बंद करावे लागले. आता हा कचरा कोकणनगरमधील खोदाई झालेल्या चिरेखाणीत टाकला जात आहे. त्यालाही सुरुवातीला काही प्रमाणात विरोध झाला. परंतु, सध्या तेथे दररोज जमा होणारा २२ टन अर्थात दर महिन्याला ६६० टन तर वर्षाला ७,९२० टन या हिशेबाने कचरा संकलित होणार आहे. दरवर्षी सुमारे ८ हजार टन जमा होणारा कचरा मात्र नष्ट करण्याची वा त्याच्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीही व्यवस्था पालिकेला गेल्या पंधरा वर्षात करता आलेली नाही. शासनाने प्रत्येक पालिकेला घनकचरा प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची मुदतही वारंवार वाढविण्यात आली. तरीही जागा मिळू शकलेली नाही. दांडेआडोम येथे अनेक वर्षांपूर्वी घनकचरा प्रकल्पासाठी घेतलेली जमीन पालिकेकडे आहे. परंतु, तेथे जाण्यास प्रथम त्या गावच्या लोकांनी रस्त्याला जागा नाकारली. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि ग्रामस्थांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प होण्याची आशा मावळली आहे. गेल्या पंधरा वर्षात घनकचरा प्रकल्पाला जागा मिळत नाही आणि कारभारी वेगवेगळया जागा दाखवत वेळ मारून नेत आहेत.प्रकल्पाला खो : कारभारी, लोकप्रतिनिधीच जबाबदार...सर्वांसाठी लढणारा शूरवीर सर्वांना हवा आहे. मात्र, तो आपल्या घरात नको, अशी सर्वांचीच भूमिका असते. घनकचरा प्रकल्पाबाबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. शहरातील सर्वच नागरिकांकडे कचरा या ना त्या कारणाने जमा होतो. परंतु, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी, कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी आपल्या भागात घनकचरा प्रकल्प नको, अशी भूमिका सातत्याने घेतली गेली आहे. ही भूमिका नागरिकांपेक्षाही त्या-त्या वॉर्डमधील लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. त्यामुळेच घनकचरा प्रकल्पाला खो बसला आहे. विरोध झुगारून चांगला प्रकल्प राबविण्यासाठी लोकप्रतिनिधीच सहकार्य करत नाहीत. त्यांचे लक्ष मतांच्या गोळाबेरजेवर असल्यानेच ही स्थिती आहे. प्रकल्पाबाबत रोज नवे...शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या पंधरा वर्षात होऊ न शकल्याने कचरा समस्या गंभीर बनली आहे. याबाबत कारभारी सातत्याने ‘आज इथे तर उद्या तिथे’ असा प्रकल्प होणार असल्याची आश्वासने देत आहेत. प्रत्यक्षात घनकचरा प्रकल्पाचा पत्ताच नाही.