शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्याचा ‘सैराट’ कारभार!

By admin | Updated: May 14, 2016 00:04 IST

प्रकल्पाचे तीनतेरा : निधी मिळूनही १५ वर्षे जागेचा शोध सुरूच...

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीरत्नागिरी शहराच्या पाणीप्रश्नाइतकाच शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात दररोज २२ ते २४ टन कचरा संकलित होत असताना वर्षोनुवर्षे कचऱ्याचे ढीग जमा झाले तरी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षात पालिकेतील कारभाऱ्यांना उभारता आला नाही. प्रकल्प उभारणीबाबतचा हा कारभार ‘सैराट’ नव्हे तर दुसरे काय, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. रत्नागिरी हे जिल्ह्याची राजधानी असलेले शहर आहे. लोकसंख्याही प्रत्यक्षात ७७ हजार आहे. शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज २२ ते २४ टन कचरा जमा होत आहे. कचरा संकलनाची पालिकेची व्यवस्था काही त्रुटी सोडल्या तर चांगली आहे. कचरा संकलनासाठी घंटा गाड्या आहेत. दहापेक्षा अधिक कचरावाहक वाहने पालिकेकडे आहेत. सफाई कामगारांची संख्या मोठी आहे. पालिकेचे व कंत्राटी असे सफाई कामगार शहर सफाई कामात व्यस्त असतात. परंतु, जमा होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंधरा वर्षांपूर्वी शहराच्या मिऱ्या हद्दीवजळ कचरा टाकला जात होता. तेथे कचऱ्याचे ढीग जमा झाल्यानंतर कचरा कुजून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. नागरिकांचा तेथे कचरा टाकण्यास विरोध झाल्याने साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील मोठ्या जागेत शहरातील संकलित कचरा टाकणे सुरू झाले. एवढी मोठी जागा असूनही तेथे पंधरा वर्षात कचऱ्याचे मैदानच तयार झाले. जाळून कचरा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, कचरा काही संपला नाही. मात्र, धुराच्या लोटांमुळे साळवी स्टॉप येथील नागरिकांचा येथे कचरा टाकण्यास तीव्र विरोध सुरू झाला. त्यामुळे चार महिन्यांपूर्वीच साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात कचरा टाकणे पालिकेला बंद करावे लागले. आता हा कचरा कोकणनगरमधील खोदाई झालेल्या चिरेखाणीत टाकला जात आहे. त्यालाही सुरुवातीला काही प्रमाणात विरोध झाला. परंतु, सध्या तेथे दररोज जमा होणारा २२ टन अर्थात दर महिन्याला ६६० टन तर वर्षाला ७,९२० टन या हिशेबाने कचरा संकलित होणार आहे. दरवर्षी सुमारे ८ हजार टन जमा होणारा कचरा मात्र नष्ट करण्याची वा त्याच्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीही व्यवस्था पालिकेला गेल्या पंधरा वर्षात करता आलेली नाही. शासनाने प्रत्येक पालिकेला घनकचरा प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची मुदतही वारंवार वाढविण्यात आली. तरीही जागा मिळू शकलेली नाही. दांडेआडोम येथे अनेक वर्षांपूर्वी घनकचरा प्रकल्पासाठी घेतलेली जमीन पालिकेकडे आहे. परंतु, तेथे जाण्यास प्रथम त्या गावच्या लोकांनी रस्त्याला जागा नाकारली. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि ग्रामस्थांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प होण्याची आशा मावळली आहे. गेल्या पंधरा वर्षात घनकचरा प्रकल्पाला जागा मिळत नाही आणि कारभारी वेगवेगळया जागा दाखवत वेळ मारून नेत आहेत.प्रकल्पाला खो : कारभारी, लोकप्रतिनिधीच जबाबदार...सर्वांसाठी लढणारा शूरवीर सर्वांना हवा आहे. मात्र, तो आपल्या घरात नको, अशी सर्वांचीच भूमिका असते. घनकचरा प्रकल्पाबाबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. शहरातील सर्वच नागरिकांकडे कचरा या ना त्या कारणाने जमा होतो. परंतु, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी, कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी आपल्या भागात घनकचरा प्रकल्प नको, अशी भूमिका सातत्याने घेतली गेली आहे. ही भूमिका नागरिकांपेक्षाही त्या-त्या वॉर्डमधील लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. त्यामुळेच घनकचरा प्रकल्पाला खो बसला आहे. विरोध झुगारून चांगला प्रकल्प राबविण्यासाठी लोकप्रतिनिधीच सहकार्य करत नाहीत. त्यांचे लक्ष मतांच्या गोळाबेरजेवर असल्यानेच ही स्थिती आहे. प्रकल्पाबाबत रोज नवे...शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या पंधरा वर्षात होऊ न शकल्याने कचरा समस्या गंभीर बनली आहे. याबाबत कारभारी सातत्याने ‘आज इथे तर उद्या तिथे’ असा प्रकल्प होणार असल्याची आश्वासने देत आहेत. प्रत्यक्षात घनकचरा प्रकल्पाचा पत्ताच नाही.