शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

CoronaVirus : मेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव तयार करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 15:36 IST

रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी आरोग्य यंत्रणा सुसज्ज पाहिजे. यासाठी डॉक्टर ही महत्वाची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रशासनाला दिले.

ठळक मुद्देमेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव तयार करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेरत्नागिरीत लॅबचे उद्घाटन, ट्रामा केअर सेंटरची उभारणी आवश्यक

रत्नागिरी : आरोग्य यंत्रणा सुसज्ज पाहिजे. यासाठी डॉक्टर ही महत्वाची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रशासनाला दिले. रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब हेही होते.या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात मुंबईहून प्रधान सचिव प्रदीप व्यास, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सर्व आमदार, विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे काम आपले एकट्याचे नसल्याचे सांगून सर्व यंत्रणांना धन्यवाद दिले. लॉकडाऊन केले आणि कुलूपाची चावी हरवली असे होता नये. संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये. जनजीवन सुरळीत होईल त्यावेळी आरोग्य सुविधा वाढविलेल्या हव्यात, असे ते म्हणाले. विकास करत असताना आपण स्वत:ला विसरलो होतो. कोरोनाने लॉकडाऊनच्या निमित्ताने आपल्याकडे, कुटुंबाकडे पाहायला शिकविले. चांगल्या सवयी, वाईट सवयी दाखविल्या कोरोनाने कुटुंब, घर दाखविले, काळजी कशी घ्यावी हेही दाखविले, असे ते म्हणाले.यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रत्नागिरीत कोरोना विषाणू लॅब झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या लॅबमध्ये अ‍ॅटोमेशन केल्यास अधिक चाचण्या करता येतील, असे त्यांनी सुचविले तसेच जिल्ह्यात अपघातांची वाढती संख्या पाहता ट्रामा केअर सेंटर उभारणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले. चाकरमानी आले आहेत, त्यांची चाचणी करा. तसेच रत्नागिरीत आयएमए या संघटनेचा उपयोग करून कोरोना मृतांची संख्या कमी करा, असे सांगितले.प्रस्तावनेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १५ दिवसांत लॅब उभारणीसाठी सहकार्य करून १ कोटी ७ लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांना धन्यवाद दिले. आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास, रत्नागिरीचे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, राज्यमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनीही या कोरोना चाचणी लॅबसाठी शासनाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल शासनाला धन्यवाद दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे यांनी आभार मानले.वाढती संख्या कमी करण्याकडे लक्ष द्यालॅब आली म्हणजे आपण सुरक्षित झालो, असे समजू नका. आता लॅबमुळे वाढलेली संख्या दिसणार आहे. त्यामुळे वाढती संख्या कमी कशी करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. ही संख्या शून्यावर येईल, ते आपले यश असेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनाचे आव्हान पत्करणारे आरोग्य यंत्रणेचे लोक ही खरी संपत्ती आहे. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे