शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

CoronaVirus Lockdown : संभ्रमावस्थेत परप्रांतीय, जीवाच्या भीतीने परतायचे की पोटाच्या आगीसाठी थांबायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:40 IST

दीड महिना घरात बसून राहिलेल्या मजूर, कामगारवर्गाचा संयम आता सुटू लागला असल्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. मात्र त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपल्यानंतर काही कामे तसेच उद्योग सुरू होतील, अशी आशा वाटत असल्याने आता गावाला जावं की थांबावं, अशा संभ्रमावस्थेत काही परप्रांतीय मजूर, कामगार सापडले आहेत.

ठळक मुद्देजीवाच्या भीतीने परतायचे की पोटाच्या आगीसाठी थांबायचेसंभ्रमावस्थेत परप्रांतीय मजूर, कामगार

रत्नागिरी :    दीड महिना घरात बसून राहिलेल्या मजूर, कामगारवर्गाचा संयम आता सुटू लागला असल्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. मात्र त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपल्यानंतर काही कामे तसेच उद्योग सुरू होतील, अशी आशा वाटत असल्याने आता गावाला जावं की थांबावं, अशा संभ्रमावस्थेत काही परप्रांतीय मजूर, कामगार सापडले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव थोपवण्याच्या दृष्टीने २३ मार्चपासून देशभर लॉकडाऊन सुरू झाले आहे. सुरूवातीला हे लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत जाहीर करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊनची मुदत दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली.

या कालावधीत सर्वच छोटे मोठे व्यवसाय - उद्योग आणि बांधकाम, रस्ते आदी कामे थांबल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना घरी बसण्याची वेळ आली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, अशा मजुरांचीही काम नसल्याने आता मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे.परजिल्ह्यातील, परराज्यातील मजुरांना याचा फटका जास्त बसला. कुटुंब सोबत असल्याने बहुतांश मजूर भाड्याच्या खोलीत राहात आहेत. त्यामुळे काम बंद असले तरी खोलीचे भाडे आणि दर दिवसाचा खाण्या-पिण्याचा खर्च तर करावाच लागत आहे. त्यामुळे काहींची उपासमार होत आहे.

जिल्ह्यात सुमारे १५ ते २० हजार कामगार, मजूर वास्तव्याला आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तसेच सामाजिक संस्थांकडून त्यांना काहीअंशी मदतीचा हात दिला जात असला तरी इतर जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळेनाशा झाल्या आहेत. मुलाबाळांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मूळ गावाचे वेध लागले आहेत.१४ एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढल्यानंतर मात्र या कामगारांचा संयम सुटू लागला. काही जण आपल्या मूळ गावी पायी जाऊ लागले. त्यातच राज्य सरकारने या कामगारांना त्यांच्या गावात जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे संकेत दिल्याने या कामगारांच्या आशा पालवल्या आहेत.

३ मेनंतर काही प्रमाणात शिथिलता आली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने इतर जिल्ह्यात तसेच राज्यातील मजुरांना पाठविण्याची व्यवस्था केल्याने अनेक कामगार परतले आहेत. परंतु काही ठिकाणी बांधकामे सुरू झाली असून, १७ मेनंतर इतरही उद्योग सुरू होतील, अशी आशा काही कामगारांना वाटत आहे. त्यामुळे गावाला जावे की इथच राहावे, अशा द्विधा अवस्थेत अडकले आहेत. काहींनी तर गावाला जाण्याचा विचार बदलला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी