शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

CoronaVirus Lockdown : संभ्रमावस्थेत परप्रांतीय, जीवाच्या भीतीने परतायचे की पोटाच्या आगीसाठी थांबायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:40 IST

दीड महिना घरात बसून राहिलेल्या मजूर, कामगारवर्गाचा संयम आता सुटू लागला असल्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. मात्र त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपल्यानंतर काही कामे तसेच उद्योग सुरू होतील, अशी आशा वाटत असल्याने आता गावाला जावं की थांबावं, अशा संभ्रमावस्थेत काही परप्रांतीय मजूर, कामगार सापडले आहेत.

ठळक मुद्देजीवाच्या भीतीने परतायचे की पोटाच्या आगीसाठी थांबायचेसंभ्रमावस्थेत परप्रांतीय मजूर, कामगार

रत्नागिरी :    दीड महिना घरात बसून राहिलेल्या मजूर, कामगारवर्गाचा संयम आता सुटू लागला असल्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. मात्र त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपल्यानंतर काही कामे तसेच उद्योग सुरू होतील, अशी आशा वाटत असल्याने आता गावाला जावं की थांबावं, अशा संभ्रमावस्थेत काही परप्रांतीय मजूर, कामगार सापडले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव थोपवण्याच्या दृष्टीने २३ मार्चपासून देशभर लॉकडाऊन सुरू झाले आहे. सुरूवातीला हे लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत जाहीर करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊनची मुदत दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली.

या कालावधीत सर्वच छोटे मोठे व्यवसाय - उद्योग आणि बांधकाम, रस्ते आदी कामे थांबल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना घरी बसण्याची वेळ आली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, अशा मजुरांचीही काम नसल्याने आता मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे.परजिल्ह्यातील, परराज्यातील मजुरांना याचा फटका जास्त बसला. कुटुंब सोबत असल्याने बहुतांश मजूर भाड्याच्या खोलीत राहात आहेत. त्यामुळे काम बंद असले तरी खोलीचे भाडे आणि दर दिवसाचा खाण्या-पिण्याचा खर्च तर करावाच लागत आहे. त्यामुळे काहींची उपासमार होत आहे.

जिल्ह्यात सुमारे १५ ते २० हजार कामगार, मजूर वास्तव्याला आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तसेच सामाजिक संस्थांकडून त्यांना काहीअंशी मदतीचा हात दिला जात असला तरी इतर जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळेनाशा झाल्या आहेत. मुलाबाळांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मूळ गावाचे वेध लागले आहेत.१४ एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढल्यानंतर मात्र या कामगारांचा संयम सुटू लागला. काही जण आपल्या मूळ गावी पायी जाऊ लागले. त्यातच राज्य सरकारने या कामगारांना त्यांच्या गावात जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे संकेत दिल्याने या कामगारांच्या आशा पालवल्या आहेत.

३ मेनंतर काही प्रमाणात शिथिलता आली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने इतर जिल्ह्यात तसेच राज्यातील मजुरांना पाठविण्याची व्यवस्था केल्याने अनेक कामगार परतले आहेत. परंतु काही ठिकाणी बांधकामे सुरू झाली असून, १७ मेनंतर इतरही उद्योग सुरू होतील, अशी आशा काही कामगारांना वाटत आहे. त्यामुळे गावाला जावे की इथच राहावे, अशा द्विधा अवस्थेत अडकले आहेत. काहींनी तर गावाला जाण्याचा विचार बदलला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी