शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरूस्ती निधीत कपात, लॉकडाऊनचा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:32 IST

लॉकडाऊनमुळे शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्ती कामाचाही समावेश आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेल्या ९८ लाखांच्या प्रस्तावाला या निर्णयाचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देमिऱ्या बंधाऱ्याच्या दुरूस्ती निधीत कपात, लॉकडाऊनचा बसला फटकाशासन आदेशानुसार मंजूर विकासनिधीला ३३ टक्के कात्री, ९८ लाखांचा प्रस्ताव

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्ती कामाचाही समावेश आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेल्या ९८ लाखांच्या प्रस्तावाला या निर्णयाचा फटका बसला आहे.रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथील रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात भरतीच्या पाण्याचा सामना करावा लागतो. येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी आजवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, तरीही मिऱ्यावासियांच्या डोक्यावरचे संकट दूर झालेले नाही. मिऱ्या बंधाऱ्याच्या सर्वेक्षणानंतर पावसाळ्यात धोका किंवा वाहून जाणारी सात ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यांच्या दुरूस्तीचा ९८ लाखांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता.

निसर्ग चक्रीवादळामुळे या ठिकाणांना आणखीन धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अडीच महिने लॉकडाऊन असल्याने राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे राज्य शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीमध्ये ३३ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे मिऱ्या बंधाऱ्याच्या ९८ लाखांच्या दुरूस्ती प्रस्तावालाही कात्री लागणार आहे. या प्रस्तावातील अंदाजित रकमेलाही कात्री लागणार असल्याच्या निर्णयाला मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला आहे. या बंधाºयाची तातडीची दुरूस्ती सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरी