शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

वेळास कासव महोत्सवावर कोरोनाचे सावट ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:32 IST

मुंबई, पुणे ही दोन शहरे आरोग्याच्या दृष्टीने सध्या हाय अर्लटवर असल्याने कोरोनाचा परिणाम ग्रामीण भागावरही होऊ लागला आहे. वेळास कासव महोत्सवाला पुण्यातील पर्यटकांचा ओघ मोठा असतो. सध्याची स्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास पर्यटक पाठ फिरवण्याची भीती अधिक आहे.

ठळक मुद्देयावर्षी आयोजकांचा अंदाज फसला व आयोजकांना ठरवून दिलेल्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक जमनूही पिल्ले बाहेर न पडल्याने पर्यटकांची निराशा झाली.

मंडणगड : वेळास येथील यंदाच्या कासव महोत्सवावर आता कोरोना आजाराचे संकट उभे ठाकले आहे. जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोनाचे रूग्ण मुंबई व पुणे या दोन महानगरात सापडल्याने वेळास येथील कासव महोत्सव यावर्षीकरिता रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच तोडणकर यांनी दिली आहे.यासंदर्भात जनजागृती करून खबरदारीचे उपाय योजण्याकरिता १२ मार्च २०२० रोजी ग्रामसभेचे आयोजनही करण्यात आले होते. कोरोना व्हायरसच्या दक्षतेकरिता यावर्षीचा कासव महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरपंच तोडणकर यांनी सांगितले. यंदाच्या कासव विणीच्या हंगाम १९ घरट्यात २१३० कासवाची अंडी, तर एक घरटे नैसर्गिक पध्दतीने संरक्षित करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या हंगामात अधिक पिल्ले बाहेर पडण्याची शक्यता होती. घरटी संरक्षित करण्याचा काळ व विणीचा हंगाम याचे गणित मांडून आयोजक व वन विभागाने ३ मार्च ही तारीख काढली व ३ मार्चपासून कासव महोत्सव सुरु होणार असल्याची जाहिरात विविध माध्यमातून करण्यात आली. मात्र, आयोजकांच्या अंदाजाच्या चार दिवस आधीच कासवांची पिल्ले सुमद्राकडे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.यावर्षी आयोजकांचा अंदाज फसला व आयोजकांना ठरवून दिलेल्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक जमनूही पिल्ले बाहेर न पडल्याने पर्यटकांची निराशा झाली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरोनाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय दळणवळणावर परिणाम झाला आहे. मुंबई, पुणे ही दोन शहरे आरोग्याच्या दृष्टीने सध्या हाय अर्लटवर असल्याने कोरोनाचा परिणाम ग्रामीण भागावरही होऊ लागला आहे. वेळास कासव महोत्सवाला पुण्यातील पर्यटकांचा ओघ मोठा असतो. सध्याची स्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास पर्यटक पाठ फिरवण्याची भीती अधिक आहे.महोत्सव रद्द, मात्र पिल्ले समुद्रात सोडणारयंदाच्या हंगामात यापुढील काळात कासव महोत्सव होणार नाही. वेळास येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेनंतर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रल्हाद तोडणकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. आरोग्य सुरक्षेच्या कारणास्तव १२ मार्च २०२० नंतरचे या वर्षीचे पूर्ण हंगामात महोत्सवाचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. मात्र, पिल्ले समुद्रात सोडण्याची प्रक्रिया हंगाम संपेपर्यंत नियमित सुरु राहणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणcorona virusकोरोना