शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

corona virus : येणार कोरोनाची दुसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 12:49 IST

coronavirusunlock, ratnagirinews कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील कोविड सेंटर्समध्ये डॉक्टरांसह अन्य कर्मचारी तसेच औषधसाठा तैनात ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देयेणार कोरोनाची दुसरी लाट?सुपर स्प्रेड व्यावसायिकांच्या कोरोना तपासणीवर अधिक भर देणार

शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील कोविड सेंटर्समध्ये डॉक्टरांसह अन्य कर्मचारी तसेच औषधसाठा तैनात ठेवण्यात आला आहे.गणेशोत्सव काळात जिल्ह्यात आलेल्या मुंबईकरांमुळे कोरोना रुग्णांची संख्या भरमसाठ वाढली. सप्टेंबर महिन्यातच केवळ साडेतीन हजार रुग्णांची भर पडली, तर १२८ जणांचे मृत्यू झाले. जागतिक स्तरावर आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे.

दिल्लीतही याची सुरूवात झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्वाधिक रुग्ण वाढले असता ज्या पद्धतीने सज्जता ठेवण्यात आली होती. त्या प्रकारे सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स अन्य कर्मचारी आणि औषधसाठा यांची संपूर्ण उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत.दिवाळीच्या कालावधीत जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी शहरांमधून आलेल्यांची संख्या जास्त होती. त्यातच आता हिवाळी पर्यटन हंगाम असल्याने पर्यटकही येऊ लागले आहेत. सगळीकडे आता अनलॉक झाल्याने सर्व बाबतीत शिथीलता आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याच्या दृष्टीनेही जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ॲंटिजेन तसेच आरटीपीसीआर या कोरोनाविषयक चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाबाबत आरोग्य विभाग सजग रहात आहे.लाट येऊ नये म्हणून...कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातही तपासणी केली जात आहे. ग्रामीण भागात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोबाईल टीमच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे.

शाळा - महाविद्यालये सुरू होणार असल्याने शिक्षकांचीही कोरोना चाचणी केली जात आहे. त्याचप्रमाणे भाजी, फळे, किराणा आदींच्या विक्रीतूनही कोरोना पसरण्याचा धोका लक्षात घेऊन या विक्रेत्यांची तपासणी सुरू होत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.सेंटर, डॉक्टर्स, औषधांचा वाढीव साठादिवाळीत झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार, हे लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा पुरेशी कोविड सेंटर्स, पुरेशा खाटांसह सुसज्ज आहे. डॉक्टर्स यांच्यासह पुरेसा कर्मचारीवर्ग आणि औषधे यांचीही उपलब्धता आहे.

गणेशोत्सव काळात रूग्ण वाढले असता ज्याप्रमाणे रूग्णालये, डॉक्टर्स, कर्मचारी तसेच औषधसाठा आणि कोविड रूग्णालये सज्ज होती, त्याप्रमाणे यावेळीही तशीच तयारी ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.- लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRatnagiriरत्नागिरी