शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

corona virus : बंद पडलेली उत्पन्नाची चाके भाजीने सावरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:25 IST

लॉकडाऊन कालावधीत दळणवळणाची सर्व साधने ठप्प झाली. रिक्षा व्यवसायही सुरु नसल्याने संसाराचा गाडा पुढे कसा हाकायचा या विवंचनेत सापडलेल्या कुर्णे येथील रिक्षा व्यावसायिक राजाराम सीताराम गुरव यांनी गावातील प्रत्येक वाडीत जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आणि उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला.

ठळक मुद्देबंद पडलेली उत्पन्नाची चाके भाजीने सावरली! भाजी व्यवसाय ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरू

अनिल कासारे लांजा : लॉकडाऊन कालावधीत दळणवळणाची सर्व साधने ठप्प झाली. रिक्षा व्यवसायही सुरु नसल्याने संसाराचा गाडा पुढे कसा हाकायचा या विवंचनेत सापडलेल्या कुर्णे येथील रिक्षा व्यावसायिक राजाराम सीताराम गुरव यांनी गावातील प्रत्येक वाडीत जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आणि उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला.लॉकडाऊन काळात पास असल्याशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव केला गेला. यामुळे रिक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. रिक्षा व्यवसाय हा हातावर पोट असलेला व्यवसाय आहे. भाडे मिळाले तर पैसा, नाहीतर दिवसभर रिक्षा थांब्यावर ग्राहकाची वाट बघत बसावे लागते.

राजाराम गुरव यांची स्थितीही वेगळी नव्हती. पंधरा दिवस कसेबसे गेले. त्यानंतर मात्र पैशांची चणचण भासू लागली. काहीतरी करायला हवे, हे लक्षात येत होते. पण करायचे काय, हे समजत नव्हते. पण गुरव यांनी हार मानली नाही.शेतीच्या कामासाठी त्यांनी शासकीय पास काढला आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा, असा मनाशी निश्चय केला. लांजा शहरात रिक्षा व्यवसाय करत असल्याने ओळख होतीच. याचा फायदा घेत गावातील लोकांनाच भाजीपाल्याची सुविधा द्यायची तयारी केली.सर्व प्रकारचे दळणवळण बंद असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत होते. त्यांना भाजीपाल्याची सेवा घरपोच दिली तर त्यांची गैरसोय दूर होईल. त्यासाठी शेतीचा वाहतूक पास होताच. त्यामुळे राजाराम गुरव यांनी आपल्या रिक्षामध्ये भाजीपाला भरून वाडीमध्ये जाऊन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यांना गावातील लोकांनीही चागला प्रतिसाद दिला.तालुक्यात अजूनही म्हणावी तशी एस. टी. सेवा सुरळीत झालेली नाही. त्यामुळे गावातील लोकांच्या सोयीसाठी राजाराम गुरव यांनी हा भाजी व्यवसाय ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केला आहे. सर्वसामान्य लोकांना लांजा येथे जाऊन भाजीपाला घेणे परवडणारे नाही. तीच भाजी वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचे काम गेले साडेचार महिने ते करीत आहेत.आठवड्याचे दोन ते तीन दिवस गावातील वाड्यांमध्ये जाऊन भाजी विक्री व इतर दिवशी रिक्षा व्यावसाय करतात. एस. टी.सह दळणवळणाची इतर साधने सुरू होत नाहीत तोपर्यंत हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकvegetableभाज्याRatnagiriरत्नागिरी