शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

corona in ratnagiri-कोरोनामुळे विवाहाचे मुहूर्तही पडले लांबणीवर, मंगल कार्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 8:34 PM

कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी सर्व व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे. देशात दिनांक १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने लग्नसराईवरही त्याचे सावट पसरले आहे. जिल्ह्यात तब्बल ७० मंगल कार्यालय असून, रत्नागिरी तालुक्यात १५ आहेत. ही सर्व मंगल कार्यालय आता बंदच आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे विवाहाचे मुहूर्तही पडले लांबणीवर, मंगल कार्यालये बंदजिल्ह्यातील ७० मंगल कार्यालयांना कुलूप

रत्नागिरी : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी सर्व व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे. देशात दिनांक १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने लग्नसराईवरही त्याचे सावट पसरले आहे. जिल्ह्यात तब्बल ७० मंगल कार्यालय असून, रत्नागिरी तालुक्यात १५ आहेत. ही सर्व मंगल कार्यालय आता बंदच आहेत.लॉकडाऊनमुळे अनेकांनी लग्न, साखरपुडा यासारखी शुभकार्य सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहेत. वार्षिक परीक्षा दिनांक ९ ते १० एप्रिलपर्यंत संपत असल्याने बहुधा त्यानंतर सुट्टीमध्ये लग्नाचे मुहूर्त काढले जातात. बहुतांश यजमान मंडळींनी लग्नाचा जथ्था काढणे, दागिने खरेदी करणे, लग्नासाठी सभागृह आरक्षित करणे, जेवण, नाश्तासाठी आॅर्डर देणे, मेहंदी, पार्लर याबरोबरच वाजंत्री, मंडप, विद्युत रोषणाई आदीसाठी आगाऊ नोंदणी करावी लागते.मात्र, लॉकडाऊनमुळे आता यातील काहीच शक्य नाही. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊनची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे. परिणामी अनेकांनी लग्न समारंभच रद्द करून दिवाळीनंतरचे मुहूर्त काढण्याचे निश्चित केले आहे. लॉकडाऊनमुळे सभागृह, पत्रिका छपाई, मंडप सजावट, विद्युत रोषणाई, वाजंत्री, कॅटरिंग व्यवसाय, फुले विक्रेते, ब्युटी पार्लर, कापड, सराफी व्यवसाय, फोटाग्राफी, व्हिडीओ शुटिंग हे व्यवसायही संकटात सापडले आहेत.जमावबंदीच्या काळात शासन आदेश झुगारून लग्न लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याने अनेक यजमानांनी याचा धसका घेत विवाह मुहूर्त पुढे ढकलला आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने ज्यांनी १५ एप्रिलनंतर लग्नाच्या तारखा निश्चित केल्या होत्या, त्यांना लग्नाची खरेदी करणे अशक्य बनले आहे. काहींनी लग्नपत्रिका छापल्या असल्या तरी आता लग्नाचे मुहूर्तच पुढे ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने पत्रिकेवरील वेळ, तारीख यात बदल करावा लागणार आहे. 

लॉकडाऊनमुळे जनता सध्या घरात बंद आहे. मंगल कार्यालय चालविणाऱ्या व्यावसायिकांसमोरही त्यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लग्न, तसेच अन्य समारंभ यावरच आम्हा व्यावसायिकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. मंगल कार्यालयांवर अवलंबून असणारे कॅटरिंग व्यावसायिक, भटजी, सजावटवाले, वाढपी, आईस्क्रिम हे व्यवसायही अडचणीत आले आहेत. १४ एप्रिलनंतर विवाह मुहूर्त असणाऱ्यांना अद्यापही आशेचा किरण असल्यामुळे त्यांच्याकडून नियोजित तारखा रद्द करण्यात आल्या नसल्या, तरी त्यापूर्वीचे असलेले मुहूर्त मात्र रद्द झाल्याने आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.- राजेंद्र देवरूखकर, व्यावसायिक

लॉगडाऊनमुळे देशातील जनता सध्या घरात बंद आहे. सभागृह चालविणाऱ्या व्यवसायिकांवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उभारले आहे. लग्न, तसेच अन्य समारंभ यावरच सभागृह चालकांचा व्यवसाय चालतो. शिवाय यावर अवलंबून असणारे कॅटरिंग, भटजी, सजावट, वाढपी, शीतपेय व्यवसाय देखील अडचणीत आले आहेत. दि.१४ एप्रिल नंतरचे मुहूर्त असणाऱ्या यजमान मंडळींना अद्यापही आशेचा किरण आहे. सध्यातरी दि.१४ नंतरच्या तारखा रद्द करण्यात आल्या नसल्या तरी यापूर्वीचे मुहूर्त रद्द झाले आहेत.- विकास खांडेकर, व्यावसायिक

मुहूर्त दिवाळीनंतरकोरोनामुळे ठरलेले विवाह सोहळे काही यजमानांनी रद्द केले असले तरी लॉकडाऊन संपल्यानंतर घरगुती पद्धतीने सोहळा आयोजित करून विवाह उरकण्याची तयारी अनेकजण करीत आहेत. घरातील मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत लॉकडाऊननंतर लग्न उरकण्याचा मनसुबा रचला जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन केव्हा संपतेय, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी