शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

corona in ratnagiri-कोरोनामुळे विवाहाचे मुहूर्तही पडले लांबणीवर, मंगल कार्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 20:36 IST

कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी सर्व व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे. देशात दिनांक १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने लग्नसराईवरही त्याचे सावट पसरले आहे. जिल्ह्यात तब्बल ७० मंगल कार्यालय असून, रत्नागिरी तालुक्यात १५ आहेत. ही सर्व मंगल कार्यालय आता बंदच आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे विवाहाचे मुहूर्तही पडले लांबणीवर, मंगल कार्यालये बंदजिल्ह्यातील ७० मंगल कार्यालयांना कुलूप

रत्नागिरी : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी सर्व व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे. देशात दिनांक १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने लग्नसराईवरही त्याचे सावट पसरले आहे. जिल्ह्यात तब्बल ७० मंगल कार्यालय असून, रत्नागिरी तालुक्यात १५ आहेत. ही सर्व मंगल कार्यालय आता बंदच आहेत.लॉकडाऊनमुळे अनेकांनी लग्न, साखरपुडा यासारखी शुभकार्य सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहेत. वार्षिक परीक्षा दिनांक ९ ते १० एप्रिलपर्यंत संपत असल्याने बहुधा त्यानंतर सुट्टीमध्ये लग्नाचे मुहूर्त काढले जातात. बहुतांश यजमान मंडळींनी लग्नाचा जथ्था काढणे, दागिने खरेदी करणे, लग्नासाठी सभागृह आरक्षित करणे, जेवण, नाश्तासाठी आॅर्डर देणे, मेहंदी, पार्लर याबरोबरच वाजंत्री, मंडप, विद्युत रोषणाई आदीसाठी आगाऊ नोंदणी करावी लागते.मात्र, लॉकडाऊनमुळे आता यातील काहीच शक्य नाही. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊनची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे. परिणामी अनेकांनी लग्न समारंभच रद्द करून दिवाळीनंतरचे मुहूर्त काढण्याचे निश्चित केले आहे. लॉकडाऊनमुळे सभागृह, पत्रिका छपाई, मंडप सजावट, विद्युत रोषणाई, वाजंत्री, कॅटरिंग व्यवसाय, फुले विक्रेते, ब्युटी पार्लर, कापड, सराफी व्यवसाय, फोटाग्राफी, व्हिडीओ शुटिंग हे व्यवसायही संकटात सापडले आहेत.जमावबंदीच्या काळात शासन आदेश झुगारून लग्न लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याने अनेक यजमानांनी याचा धसका घेत विवाह मुहूर्त पुढे ढकलला आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने ज्यांनी १५ एप्रिलनंतर लग्नाच्या तारखा निश्चित केल्या होत्या, त्यांना लग्नाची खरेदी करणे अशक्य बनले आहे. काहींनी लग्नपत्रिका छापल्या असल्या तरी आता लग्नाचे मुहूर्तच पुढे ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने पत्रिकेवरील वेळ, तारीख यात बदल करावा लागणार आहे. 

लॉकडाऊनमुळे जनता सध्या घरात बंद आहे. मंगल कार्यालय चालविणाऱ्या व्यावसायिकांसमोरही त्यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लग्न, तसेच अन्य समारंभ यावरच आम्हा व्यावसायिकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. मंगल कार्यालयांवर अवलंबून असणारे कॅटरिंग व्यावसायिक, भटजी, सजावटवाले, वाढपी, आईस्क्रिम हे व्यवसायही अडचणीत आले आहेत. १४ एप्रिलनंतर विवाह मुहूर्त असणाऱ्यांना अद्यापही आशेचा किरण असल्यामुळे त्यांच्याकडून नियोजित तारखा रद्द करण्यात आल्या नसल्या, तरी त्यापूर्वीचे असलेले मुहूर्त मात्र रद्द झाल्याने आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.- राजेंद्र देवरूखकर, व्यावसायिक

लॉगडाऊनमुळे देशातील जनता सध्या घरात बंद आहे. सभागृह चालविणाऱ्या व्यवसायिकांवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उभारले आहे. लग्न, तसेच अन्य समारंभ यावरच सभागृह चालकांचा व्यवसाय चालतो. शिवाय यावर अवलंबून असणारे कॅटरिंग, भटजी, सजावट, वाढपी, शीतपेय व्यवसाय देखील अडचणीत आले आहेत. दि.१४ एप्रिल नंतरचे मुहूर्त असणाऱ्या यजमान मंडळींना अद्यापही आशेचा किरण आहे. सध्यातरी दि.१४ नंतरच्या तारखा रद्द करण्यात आल्या नसल्या तरी यापूर्वीचे मुहूर्त रद्द झाले आहेत.- विकास खांडेकर, व्यावसायिक

मुहूर्त दिवाळीनंतरकोरोनामुळे ठरलेले विवाह सोहळे काही यजमानांनी रद्द केले असले तरी लॉकडाऊन संपल्यानंतर घरगुती पद्धतीने सोहळा आयोजित करून विवाह उरकण्याची तयारी अनेकजण करीत आहेत. घरातील मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत लॉकडाऊननंतर लग्न उरकण्याचा मनसुबा रचला जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन केव्हा संपतेय, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी