शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोरोना संकटाचा फटका यंदा वृक्ष लागवडीलाही, महत्त्वाकांक्षी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:00 IST

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या चार वर्षात यशस्वीपणे राबविली गेली होती. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ८५ लाख ९४ हजार (११६.४३ टक्के) इतकी वृक्ष लागवड झाली आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे आता शेवटच्या वर्षी ५० कोटी योजनेला जिल्ह्यासह राज्यात खीळ बसली आहे.

ठळक मुद्देकोरोना संकटाचा फटका यंदा वृक्ष लागवडीलाही, महत्त्वाकांक्षी योजनापन्नास कोटी रोपे लावण्याचे होते उद्दिष्ट, जिल्हा आघाडीवर, काम झाले ११६ टक्के

रत्नागिरी : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या चार वर्षात यशस्वीपणे राबविली गेली होती. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ८५ लाख ९४ हजार (११६.४३ टक्के) इतकी वृक्ष लागवड झाली आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे आता शेवटच्या वर्षी ५० कोटी योजनेला जिल्ह्यासह राज्यात खीळ बसली आहे.तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण जतन करण्यासाठी तापमानातील वाढ, हवामान ऋतूबदल यामुळे होणारी दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी राज्य सरकारने २०१६ साली ५० कोटी वृक्ष लागवडीची योजना जाहीर केली. यात पहिल्या वर्षी २०१६ - १७ या सालाकरिता राज्यासाठी एकाच दिवशी २ कोटीचे उद्दिष्ट होते.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ लाख ६४ हजार लागवडीचे उद्दिष्ट होते. १ ते ३१ जुलै या कालावधीत हे उद्दिष्ट ओलांडून पहिल्याच वर्षी जिल्ह्याने दोन लाख पाच हजार (१२४ टक्के) वृक्ष लागवडीचा टप्पा गाठला. सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग आदी विविध यंत्रणांच्या सहाय्याने उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड करण्यात आली.सन २०१७ - १८ करिता राज्याला ४ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी जिल्ह्याला ३ लाखांचे उद्दिष्ट होेते. यावर्षीही जिल्ह्याने सर्व यंत्रणांच्या सहकार्याने उद्दिष्ट ओलांडून ३ लाख ८० हजार (१२६ टक्के) लागवड केली. २०१८ - १९ साली राज्याला १३ कोटींचे, तर जिल्ह्याला २० लाख ५४ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावेळीही जिल्ह्याने उद्दिष्ट ओलांडून २२ लाख ३७ हजार (१०९ टक्के) वृक्षलागवड केली.

२०१९ - २० साली राज्याच्या ३३ कोटी उद्दिष्टापैकी जिल्ह्याला ४८ लाख ६३ हजारांचे उद्दिष्ट असताना जिल्ह्याने ५७ कोटी ७२ लाखांचा (११८.६९ टक्के) टप्पा गाठला. शेवटच्या पाचव्या वर्षी राज्याने ५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, यावर्षी कोरोना संकट फेब्रुवारीपासूनच सुरू झाले आहे. त्यामुळे यावर्षी या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसली आहे.त्या जागा भरायला हव्यानिसर्ग चक्रीवादळात दापोली, मंडणगड, गुहागर येथे अनेक शासकीय जागेतील वृक्ष कोलमडून पडले आहेत. तसेच चौपदरीकरणाच्या कामामुळे मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गही ओसाड होऊ लागला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची योजना राबविताना तुटलेल्या झाडांच्या ठिकाणी लागवड करून ती झाडे जगवल्यास योजनेचे उद्दिष्ट साध्य होईल.यंदा पाचवे वर्ष२०१६ साली योजना सुरू होता पहिल्या वर्षी २ कोटी, दुसऱ्या वर्षी ४ कोटी, तिसऱ्या वर्षी १३ कोटी, चौथ्या वर्षी ३३ कोटी आणि शेवटच्या पाचव्या वर्षी ५० कोटींचे उद्दिष्ट होते.रत्नागिरी जिल्ह्यात उद्दिष्टपूर्तीजिल्ह्याला पहिल्या वर्षी १ कोटी ६४ लाख, दुसऱ्या वर्षी ३ लाख, तिसऱ्या वर्षी २० लाख ५४ हजार, तर चौथ्या वर्षी ४८ लाख ६३ हजार असे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने एकूण ७३ लाख ८१ हजार एवढे उद्दिष्ट ओलांडून ८५ लाख ९४ (११६.४३ टक्के) वृक्ष लागवड केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग