शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोरोना संकटाचा फटका यंदा वृक्ष लागवडीलाही, महत्त्वाकांक्षी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:00 IST

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या चार वर्षात यशस्वीपणे राबविली गेली होती. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ८५ लाख ९४ हजार (११६.४३ टक्के) इतकी वृक्ष लागवड झाली आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे आता शेवटच्या वर्षी ५० कोटी योजनेला जिल्ह्यासह राज्यात खीळ बसली आहे.

ठळक मुद्देकोरोना संकटाचा फटका यंदा वृक्ष लागवडीलाही, महत्त्वाकांक्षी योजनापन्नास कोटी रोपे लावण्याचे होते उद्दिष्ट, जिल्हा आघाडीवर, काम झाले ११६ टक्के

रत्नागिरी : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या चार वर्षात यशस्वीपणे राबविली गेली होती. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ८५ लाख ९४ हजार (११६.४३ टक्के) इतकी वृक्ष लागवड झाली आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे आता शेवटच्या वर्षी ५० कोटी योजनेला जिल्ह्यासह राज्यात खीळ बसली आहे.तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण जतन करण्यासाठी तापमानातील वाढ, हवामान ऋतूबदल यामुळे होणारी दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी राज्य सरकारने २०१६ साली ५० कोटी वृक्ष लागवडीची योजना जाहीर केली. यात पहिल्या वर्षी २०१६ - १७ या सालाकरिता राज्यासाठी एकाच दिवशी २ कोटीचे उद्दिष्ट होते.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ लाख ६४ हजार लागवडीचे उद्दिष्ट होते. १ ते ३१ जुलै या कालावधीत हे उद्दिष्ट ओलांडून पहिल्याच वर्षी जिल्ह्याने दोन लाख पाच हजार (१२४ टक्के) वृक्ष लागवडीचा टप्पा गाठला. सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग आदी विविध यंत्रणांच्या सहाय्याने उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड करण्यात आली.सन २०१७ - १८ करिता राज्याला ४ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी जिल्ह्याला ३ लाखांचे उद्दिष्ट होेते. यावर्षीही जिल्ह्याने सर्व यंत्रणांच्या सहकार्याने उद्दिष्ट ओलांडून ३ लाख ८० हजार (१२६ टक्के) लागवड केली. २०१८ - १९ साली राज्याला १३ कोटींचे, तर जिल्ह्याला २० लाख ५४ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावेळीही जिल्ह्याने उद्दिष्ट ओलांडून २२ लाख ३७ हजार (१०९ टक्के) वृक्षलागवड केली.

२०१९ - २० साली राज्याच्या ३३ कोटी उद्दिष्टापैकी जिल्ह्याला ४८ लाख ६३ हजारांचे उद्दिष्ट असताना जिल्ह्याने ५७ कोटी ७२ लाखांचा (११८.६९ टक्के) टप्पा गाठला. शेवटच्या पाचव्या वर्षी राज्याने ५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, यावर्षी कोरोना संकट फेब्रुवारीपासूनच सुरू झाले आहे. त्यामुळे यावर्षी या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसली आहे.त्या जागा भरायला हव्यानिसर्ग चक्रीवादळात दापोली, मंडणगड, गुहागर येथे अनेक शासकीय जागेतील वृक्ष कोलमडून पडले आहेत. तसेच चौपदरीकरणाच्या कामामुळे मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गही ओसाड होऊ लागला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची योजना राबविताना तुटलेल्या झाडांच्या ठिकाणी लागवड करून ती झाडे जगवल्यास योजनेचे उद्दिष्ट साध्य होईल.यंदा पाचवे वर्ष२०१६ साली योजना सुरू होता पहिल्या वर्षी २ कोटी, दुसऱ्या वर्षी ४ कोटी, तिसऱ्या वर्षी १३ कोटी, चौथ्या वर्षी ३३ कोटी आणि शेवटच्या पाचव्या वर्षी ५० कोटींचे उद्दिष्ट होते.रत्नागिरी जिल्ह्यात उद्दिष्टपूर्तीजिल्ह्याला पहिल्या वर्षी १ कोटी ६४ लाख, दुसऱ्या वर्षी ३ लाख, तिसऱ्या वर्षी २० लाख ५४ हजार, तर चौथ्या वर्षी ४८ लाख ६३ हजार असे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने एकूण ७३ लाख ८१ हजार एवढे उद्दिष्ट ओलांडून ८५ लाख ९४ (११६.४३ टक्के) वृक्ष लागवड केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग